शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Kerala Floods : नियोजन नसल्यानेच केरळवर पुराची वेळ : शरत शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:49 IST

पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देनियोजन नसल्यानेच केरळवर पुराची वेळ : शरत शर्मा कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालाप

कोल्हापूर : पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. देशभ्रमंती करताना याचवेळी तिथे पावसाने थैमान घातले; पण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले. पत्रकारांनी धकाधकीतूनही व्यायाम करून शरीर तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.रस्ते वाहतूक सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जनजागृतीसाठी नवी दिल्लीचे ६० वर्षीय निवृत्त पत्रकार शरत शर्मा यांनी २३ राज्यांतून हजारो किलोमीटरचा प्रवास आपल्या दुचाकीवरून करत रविवारी ते कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालापमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रमुख उपस्थिती अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, आदींची होती.शर्मा यांनी आजवरच्या प्रवासातील कटू-गोड अनुभव सांगितले. सामाजिक बांधीलकीतून या जनजागृती मोहिमेला सुरुवात केली. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतामध्ये अजूनही तंत्रज्ञानाची कमतरता आहे. चीन, जपान, अमेरिका यांसारख्या विकसित देशांच्या रांगेत भारताला यायचे असेल, तर तंत्रज्ञान ही महत्त्वाची गोष्ट आहे.पत्रकारिता करताना पत्रकारांना नेहमीच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. संपूर्ण आयुष्य धावपळीचे असते; पण निवृत्तीनंतर आपली आयुष्याची पुंजी दवाखान्यात घालवण्यापेक्षा आत्तापासूनच व्यायामाचे महत्त्व जाणून घ्या, असा सल्लाही शर्मा यांनी दिला.विजय पाटील यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी प्रेस क्लबचे पदाधिकारी, संचालक व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर