शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Kerala Floods : नियोजन नसल्यानेच केरळवर पुराची वेळ : शरत शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:49 IST

पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देनियोजन नसल्यानेच केरळवर पुराची वेळ : शरत शर्मा कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालाप

कोल्हापूर : पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. देशभ्रमंती करताना याचवेळी तिथे पावसाने थैमान घातले; पण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले. पत्रकारांनी धकाधकीतूनही व्यायाम करून शरीर तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.रस्ते वाहतूक सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जनजागृतीसाठी नवी दिल्लीचे ६० वर्षीय निवृत्त पत्रकार शरत शर्मा यांनी २३ राज्यांतून हजारो किलोमीटरचा प्रवास आपल्या दुचाकीवरून करत रविवारी ते कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालापमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रमुख उपस्थिती अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, आदींची होती.शर्मा यांनी आजवरच्या प्रवासातील कटू-गोड अनुभव सांगितले. सामाजिक बांधीलकीतून या जनजागृती मोहिमेला सुरुवात केली. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतामध्ये अजूनही तंत्रज्ञानाची कमतरता आहे. चीन, जपान, अमेरिका यांसारख्या विकसित देशांच्या रांगेत भारताला यायचे असेल, तर तंत्रज्ञान ही महत्त्वाची गोष्ट आहे.पत्रकारिता करताना पत्रकारांना नेहमीच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. संपूर्ण आयुष्य धावपळीचे असते; पण निवृत्तीनंतर आपली आयुष्याची पुंजी दवाखान्यात घालवण्यापेक्षा आत्तापासूनच व्यायामाचे महत्त्व जाणून घ्या, असा सल्लाही शर्मा यांनी दिला.विजय पाटील यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी प्रेस क्लबचे पदाधिकारी, संचालक व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर