शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

अलमट्टी, हिप्परगीच्या विसर्गावर लक्ष ठेवा, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:50 IST

पूर येऊच नये अशा उपाययोजना करा

कोल्हापूर : मे महिन्यापासूनच ज्या पद्धतीने ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे, ते पाहता जिल्ह्यास महापुराचा धोका आहे. पावसाच्या प्रमाणात हिप्परगी बंधारा आणि अलमट्टीमधील पाण्याचा विसर्ग ठेवला तर हा धोका टळणार आहे त्यामुळे विसर्गावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, त्यासाठी दोन्ही ठिकाणी निवृत्त नको तर सेवेत असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करा. पूर आल्यानंतर पळापळ करण्याऐवजी तो येऊच नये यासाठीच्या उपाययोजना करा अशा सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीतील पाणीसाठा ५१७ मीटर राहील आणि पावसाचा जोर वाढला की हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले होतील या दोन्ही बाबींवर लक्ष ठेवले तरी पुराचा धोका कमी होणार आहे. राधानगरी, वारणा आणि कोयनेतील विसर्ग सुरू होत नाही तोपर्यंत धोका नाही.ढगफुटीसारखा पाऊस तासभर झाला तरी शहराचे तळे होते. या पुढेच असाच बेभरवशाचा पाऊस होणार हे गृहीत धरून धरण क्षेत्राबाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी नालेसफाई करा, सखल भागात पाणी साठू नये याची काळजी घ्या.

धोकादायक ठिकाणी फलक, बॅरिकेड्सआमदार अमल महाडिक यांनी धोकादायक पूल, धबधब्यांच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी सूचना केली. त्यावर मंत्री आबिटकर यांनी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी अशा ठिकाणी सूचना फलक लावावेत, रस्त्यावर ओढ्यांचे पाणी आल्यावर तेथून कोणी जाणार नाही ही जबाबदारी यंत्रणेची असेल. जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व पुलांची तपासणी केली जाईल असे सांगितले.

तातडीने कन्सल्टंट नेमामंत्री आबिटकर पाच वर्षांपूर्वी भूस्खलनाने मृत्यू झालेल्या गावांमध्ये काय उपाययोजना केल्या यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कन्सल्टंट नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर आबिटकर यांनी पाच वर्षांत काहीच काम केले नाही, उद्या नागरिकांनी विचारले तर काय उत्तर द्यायचे. जोतिबा, पन्हाळ्यासह हा धोका असलेल्या गावांच्या अभ्यासासाठी तातडीने कन्सल्टंट नेमा, ठिकाणे शोधून तेथे निर्धारित वेळेत भूस्खलन सौम्यीकरणाच्या उपाययोजना करा असे सांगितले.