शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी, हिप्परगीच्या विसर्गावर लक्ष ठेवा, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:50 IST

पूर येऊच नये अशा उपाययोजना करा

कोल्हापूर : मे महिन्यापासूनच ज्या पद्धतीने ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे, ते पाहता जिल्ह्यास महापुराचा धोका आहे. पावसाच्या प्रमाणात हिप्परगी बंधारा आणि अलमट्टीमधील पाण्याचा विसर्ग ठेवला तर हा धोका टळणार आहे त्यामुळे विसर्गावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, त्यासाठी दोन्ही ठिकाणी निवृत्त नको तर सेवेत असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करा. पूर आल्यानंतर पळापळ करण्याऐवजी तो येऊच नये यासाठीच्या उपाययोजना करा अशा सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीतील पाणीसाठा ५१७ मीटर राहील आणि पावसाचा जोर वाढला की हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले होतील या दोन्ही बाबींवर लक्ष ठेवले तरी पुराचा धोका कमी होणार आहे. राधानगरी, वारणा आणि कोयनेतील विसर्ग सुरू होत नाही तोपर्यंत धोका नाही.ढगफुटीसारखा पाऊस तासभर झाला तरी शहराचे तळे होते. या पुढेच असाच बेभरवशाचा पाऊस होणार हे गृहीत धरून धरण क्षेत्राबाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी नालेसफाई करा, सखल भागात पाणी साठू नये याची काळजी घ्या.

धोकादायक ठिकाणी फलक, बॅरिकेड्सआमदार अमल महाडिक यांनी धोकादायक पूल, धबधब्यांच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी सूचना केली. त्यावर मंत्री आबिटकर यांनी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी अशा ठिकाणी सूचना फलक लावावेत, रस्त्यावर ओढ्यांचे पाणी आल्यावर तेथून कोणी जाणार नाही ही जबाबदारी यंत्रणेची असेल. जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व पुलांची तपासणी केली जाईल असे सांगितले.

तातडीने कन्सल्टंट नेमामंत्री आबिटकर पाच वर्षांपूर्वी भूस्खलनाने मृत्यू झालेल्या गावांमध्ये काय उपाययोजना केल्या यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कन्सल्टंट नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर आबिटकर यांनी पाच वर्षांत काहीच काम केले नाही, उद्या नागरिकांनी विचारले तर काय उत्तर द्यायचे. जोतिबा, पन्हाळ्यासह हा धोका असलेल्या गावांच्या अभ्यासासाठी तातडीने कन्सल्टंट नेमा, ठिकाणे शोधून तेथे निर्धारित वेळेत भूस्खलन सौम्यीकरणाच्या उपाययोजना करा असे सांगितले.