शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

‘केडीसीसी’त शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या वळचणीला

By admin | Updated: April 20, 2015 00:25 IST

कार्यकर्ते वाऱ्यावर : सहा आमदार, तरीही ‘गोकुळ’मध्ये अस्तित्व शून्यच; पक्षवाढीची संधी हुकली

राजाराम लोंढे - कोल्हापूर‘गोकुळ’प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या वळचणीलाच उभे राहण्याच्या तयारीत आहे. सहा आमदार असतानाही नेत्यांचा पैरा फेडण्याच्या नादात दुसऱ्याच्या मागून फरफटत जाण्याची वेळ शिवसेना कार्यकर्त्यांच्यावर आली आहे. शिखरसंस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षवाढीची नामी संधी आली होती; पण ‘सोयीच्या राजकारणा’ने पदापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची राजकीय ताकद या सहकारी संस्था आहेत. आजपर्यंतचे त्यांचे राजकारण या संस्थांभोवतीच फिरल्याने त्यांनी ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत आपला दबदबा कायम राखला; पण गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक त्वेषाने बाहेर पडला आणि दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. दहापैकी तब्बल सहा आमदार शिवसेनेचे निवडून आले. उशिरा का असेना, पण पक्ष राज्यातील सत्तेत गेल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीने याच सत्तेचा वापर करून पक्ष ग्रामीण भागात पोहोचविला, तशी नामी संधी शिवसेनेला आली आहे; पण नेत्यांच्या कचखाऊ व सोयीच्या भूमिकेमुळे पक्षवाढीवर मर्यादा येत आहेत. ‘गोकुळ’, जिल्हा बॅँक, बाजार समिती ही तिन्ही सत्ता केंद्रे आगामी राजकारणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ‘गोकुळ’ निवडणुकीत आमदार सत्यजित पाटील यांनी आपल्या घरात उमेदवारी घेऊन सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला. आमदार चंद्रदीप नरके यांची अरुण नरके यांच्यामुळे गोची झालेली आहे. आमदार प्रकाश आबिटकर, सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा दिला आहे. आमदार उल्हास पाटील व आमदार सुजित मिणचेकर यांची ‘नरोवा कुंजरोवा’ अशीच भूमिका राहिल्याने ‘गोकुळ’सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत ताकदीच्या कार्यकर्त्याला संधी मिळू शकलेली नाही. ‘गोकुळ’प्रमाणे जिल्हा बॅँकेतही तीच अवस्था आहे. येथे शिवसेना, भाजपच्या आमदारांनी दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना बरोबर घेऊन पॅनेल बांधणे गरजेचे होते. जय-पराजयापेक्षा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ताकदीने उतरले तर बाजार समिती हातात येण्यास फारवेळ लागणार नाही, पण शिवसेना नेत्यांनी स्वत:च्या सोयीपेक्षा पक्ष व कार्यकर्त्याला महत्त्व दिले तर हे होऊ शकते. भाजप करते, मग शिवसेनेला काय झालेभाजपचे जिल्ह्यात तीन आमदार असताना त्यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शेवटपर्यंत दबावाचे राजकारण केले. ‘स्वीकृत संचालक’ पदावर त्यांनी आपली ‘तलवार म्यान’ केली असली, तरी किमान सत्तारूढ गटावर दबाव टाकण्याचे काम तरी केले; पण सहा आमदार असताना एकाही जागेची मागणी या नेत्यांनी एकत्रितपणे न करता आपली सोय बघितल्याने कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आयते कोलीत हातात; तरी शांतताचएरव्ही दोन्ही कॉँग्रेसच्या कारभारावर भाषणात हल्ला करणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयते कोलीत हातात आले होते. दोन्ही काँग्रेसच्या कारभारामुळेच बँकेवर प्रशासक आल्याने त्यांच्याविरोधात निवडणुकीत रान उठविण्याची संधी आली आहे; पण शिवसेनेचे वाघ डरकाळी फोडण्याऐवजी शांतच आहेत.