शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नको रे बाबा काश्मीरची गुलाबी थंडी.. पर्यटकांत उडाली घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:13 IST

श्रीनगरमध्ये दिवसभर हॉटेलमध्येच

समीर देशपांडेकोल्हापूर : पहलगाम येथे मोठा आतंकवादी हल्ला झाल्यानंतर आता काश्मीरला जाणाऱ्यांनी आपला बेत रद्द केला आहे. ‘लाखो रुपये भरून आणि जिवाला घोर कुठं लावून घ्यायचा’, असे म्हणत अनेकांनी आपला काश्मीर दौरा रद्द करण्याची विनंती सहल संयोजकांना केली आहे. वर्षातून एकदाच मोठ्या सहलीला जाणे होत असल्याने अनेकांनी पर्यायी पर्यटनस्थळांची चाचपणी सुरू केली आहे.काल दुपारी हा हल्ला झाल्यानंतर साहजिकच कोल्हापूर आणि परिसरातील जे पर्यटक काश्मीरला गेले आहेत. त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंता पसरली. अनेकांचे मोबाइल लागत नसल्याने या काळजीत परत भर पडली, परंतु रात्री उशिरा महाराष्ट्रातील मृत्यू पावलेल्यांची नावे जाहीर झाली आणि कोल्हापूर आणि परिसरातील कोणी नसल्याचे स्पष्ट झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.दरम्यान या घटनेनंतर सहल संयोजक कंपन्यांमध्येही अस्वस्थता पसरली, कारण एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून नियोजन करून सहली आयोजित केल्या असताना, त्या रद्द करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर आणि परिसरातील सुमारे २०० हून अधिक पर्यटक सध्या काश्मीरमध्ये असून, त्यातील काही जण परत येण्यासही निघाले आहेत.येथील गगन टुरिझमतर्फे गेलेले १६ पर्यटक घटना घडण्याआधीच पहलगामवरून बाहेर पडले होते. ते सुखरूप श्रीनगरला हॉटेलवर पोहोचले. ते परतीच्या मार्गावर आहेत. सहल संयोजक आदित्य मिरजे म्हणाले, रूकडी परिसरातील तीन डॉक्टर दाम्पत्ये पहलगामला गेली होती. परंतु, ती सुखरूप असून, उद्या परत येत आहेत.

श्रीनगरमध्ये दिवसभर हॉटेलमध्येचवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. एल. हरेर, आजऱ्यातील व्यापारी गजानन केळकर, प्रकाश टोपले हे सपत्नीक काश्मीरला गेले होते. त्यांच्यासोबत पुण्याची पाच दाम्पत्ये आहेत. परंतु काल दुपारनंतर श्रीनगरमध्ये आल्यानंतर पहलगाम येथे हा हल्ला झाला. बुधवारी श्रीनगरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, हे सर्वजण हॉटेलवरच थांबले. उद्या ही सर्व मंडळी परतणार आहेत.

भीती बाजूला सारून पर्यटनएकीकडे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे अनेक पर्यटकांनी श्रीनगरजवळील दाल लेक येथे जलपर्यटनाचा आनंद घेतला, तर निशांत उद्यानालाही भेट दिली. सहल संयोजक रवी सरदार म्हणाले की, कोल्हापूर आणि परिसरातील पर्यटकांनी इतक्या लांब आल्यानंतर हॉटेलवर थांबणे पसंत न करता आज जलविहाराचा आनंद घेतला.

लाखोंची उलाढाल ठप्पकोल्हापूरहून काश्मीरला जाण्यासाठी सरासरी प्रतिव्यक्ती ७० हजार रुपये खर्च येतो. गतवर्षी ५०० हून अधिक पर्यटक मे महिन्यात काश्मीरला गेले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी आपली आरक्षणे रद्द केली आहेत. काहींनी सहल संयोजक यांच्याकडे पैसे परत मागितले असून, काहींनी पर्यायी पर्यटनस्थळांची पसंती दर्शवली आहे. यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

येत्या रविवारी आणि पुढच्या रविवारी प्रत्येकी ४० असे एकूण कोल्हापूर आणि परिसरातील ८० पर्यटक काश्मीरला जाणार होते. या सहली रद्द करण्यात आल्या असून, १५ मेपर्यंत काश्मीर सहलीसाठी आरक्षणही बंद केले आहे. - रवींद्र पोतदार, गिरीकंद हॉलिडेज 

सहल संयोजकांची परीक्षा बघणारा असा हा प्रसंग आहे. इतके दिवस मेहनत करून सहलींचे संयोजन केलेले असते. परंतु, या दुर्घटनेमुळे आमच्या अनेक सदस्यांना या सहली रद्द कराव्या लागत आहेत. - बळीराम वराडे, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाtourismपर्यटनJammu Kashmirजम्मू-काश्मीर