शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:23 IST

यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती.

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच उत्तर कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे. तिला तोंड देण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी आणि उजनीमधून तीन टीएमसी असे सहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मार्चच्या सुरुवातीपासूनच बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एप्रिलमध्ये ती तीव्र झाली. मे मध्ये ती आणखी भीषण होणार आहे. त्यामुळे महाराष्टÑ सरकारने मानवतावादी भूमिकेतून कोयना धरणातून ३ आणि उजनी धरणातून ३ असे सहा टीएमसी पाणी सोडावे. यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविता येईल तसेच जनावरेही जगवता येतील, असे येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.‘कोयना’मध्ये ४३ टीएमसी पाणीकोयना धरण सोमवार, दि. ११ रोजी ४२.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपातळी २०९८.०६ फूट आहे. कोयनेच्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील शिल्लक पाणीसाठा महिनाभर सहज पुरू शकतो. गेल्या वर्षी कोयना धरणात १२ मे रोजी अवघा ३१.०६ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर उजनी धरणात ६४.५७ टीएमसी पाणीसाठ शिल्लक आहे.कर्नाटकसाठी ६ टीएमसी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री येदियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबाबत माहिती नाही. ती मिळाल्यावर धरणात शिल्लक पाणीसाठा किती आहे हे पाहून योग्य निर्णय घेतला जाईल.- जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री

टॅग्स :WaterपाणीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र