शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:23 IST

यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती.

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच उत्तर कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे. तिला तोंड देण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी आणि उजनीमधून तीन टीएमसी असे सहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मार्चच्या सुरुवातीपासूनच बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एप्रिलमध्ये ती तीव्र झाली. मे मध्ये ती आणखी भीषण होणार आहे. त्यामुळे महाराष्टÑ सरकारने मानवतावादी भूमिकेतून कोयना धरणातून ३ आणि उजनी धरणातून ३ असे सहा टीएमसी पाणी सोडावे. यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविता येईल तसेच जनावरेही जगवता येतील, असे येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.‘कोयना’मध्ये ४३ टीएमसी पाणीकोयना धरण सोमवार, दि. ११ रोजी ४२.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपातळी २०९८.०६ फूट आहे. कोयनेच्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील शिल्लक पाणीसाठा महिनाभर सहज पुरू शकतो. गेल्या वर्षी कोयना धरणात १२ मे रोजी अवघा ३१.०६ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर उजनी धरणात ६४.५७ टीएमसी पाणीसाठ शिल्लक आहे.कर्नाटकसाठी ६ टीएमसी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री येदियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबाबत माहिती नाही. ती मिळाल्यावर धरणात शिल्लक पाणीसाठा किती आहे हे पाहून योग्य निर्णय घेतला जाईल.- जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री

टॅग्स :WaterपाणीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र