शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Kolhapur: काळम्मावाडी धरण गळती प्रस्ताव लालफितीत, पावसाळ्यानंतर काम शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:08 IST

निविदेच्या टप्यातच शासनाकडून दिरंगाई

कोल्हापूर : काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातील गळती काढण्याची निविदा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यात प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याला मंजुरी मिळून वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. परिणामी येत्या पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे पाटबंधारे प्रशासनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.राधानगरी तालुक्यात असणाऱ्या काळम्मावाडी धरणात २५.४० टीएमसी पाणीसाठा करता येतो. मात्र, दगड-मातीच्या असणाऱ्या या धरणाच्या पायामध्येही प्रचंड गळती आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकत नाही. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाची गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागाने ८० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. धरणावर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे हे धरण जिल्ह्यातील समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या धरणाच्या गळती काढण्यासाठीच्या कामाला निधी मिळवण्यासाठी शासकीय पातळीवर वजन वापरले. मात्र, निविदा निश्वित होऊन वर्कऑर्डर मिळण्याच्या प्रक्रियेत हा प्रस्ताव शासकीय पातळीवर लालफितीत अडकला. परिणामी तातडीने काम सुरू होणार नाही. आता लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. वर्कऑर्डर मिळाले तरी आचारसंहिता संपेपर्यंत गळतीच्या कामाचा प्रारंभ होणार नाही. ही सर्व प्रकिया पूर्ण होईपर्यंत जून महिना उजाडणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर गळतीचे काम करणे अडचणीचे ठरणार आहे. परिणामी पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण