शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना चार वर्षांनी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:14 IST

संघटनेतील फुटीमुळे धरणग्रस्तांची ताकद आणि आवाजही विभागला गेला. परिणामी सरकार दरबारी कामे करवून घेताना अनेक अडचणी आल्या. अखेर चार वर्षांनी या दोघांनाही चुकांची जाणीव झाल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपरिणामी सरकार दरबारी कामे करवून घेताना अनेक अडचणी आल्या.

कोल्हापूर : परस्परांवर हितसंबंधाचा आरोप करत चार वर्षांपूर्वी दोन शकले झालेल्या काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतील नेत्यांना अखेर उपरती झाली आहे. दोघांनीही पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचे जाहीर करून येथून पुढे एकाच संघटनेच्या झेंड्याखाली धरणग्रस्तांना न्याय मिळवून देऊ, असे स्पष्ट केले आहे.

काळम्मावाडी धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार शंकर पाटील व रंगराव पाटील यांच्या नेतृत्वास स्थापन झालेल्या संघटनेत चार वर्षांपूर्वी उभी फूट पडली. गुंडोपंत पाटील व बाबूराव पाटील यांनी सवतासुभा मांडला. संघटनेतील फुटीमुळे धरणग्रस्तांची ताकद आणि आवाजही विभागला गेला. परिणामी सरकार दरबारी कामे करवून घेताना अनेक अडचणी आल्या. अखेर चार वर्षांनी या दोघांनाही चुकांची जाणीव झाल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला.

धरणग्रस्तांच्या बैठकीत ही घोषणा करून येथून पुढे एकत्रितपणे काम करू, असे या दोघांनीही जाहीर केले. काळम्मावाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही काही प्रमाणात रखडलेले आहे. शिवाय स्लॅब कमी करण्याच्या धोरणामुळे अजूनही काहीजणांना जमिनी मिळालेल्या नाहीत. ज्यांना जमिनी मिळाल्या आहेत, तेथेही ताब्यावरून वाद आहेत.

धरणग्रस्त वसाहतीमध्ये सुविधांचे प्रश्न गंभीर आहेत. याशिवाय धरणग्रस्त म्हणून दाखले आणि तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणेही अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघटना एकत्र येऊन पूर्वीप्रमाणे काम करणार असल्याने आता प्रश्न मांडण्याला जोर लागणार आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरDamधरण