शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

ऐन पावसाळ्यातही कोल्हापुरातील कळंबा तलाव कोरडाच, अद्यापही पाणीपातळी चार फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:06 IST

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने ...

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने दडी मारून बरीच हुलकावणी दिल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत किंचितही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. आजमितीला पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली असून, तलावपात्राचा वापर विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी होत आहे.पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहतो. तलावपात्रात निव्वळ डेड अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक असून, जलचरांच्या अस्तित्वासाठी ताे शिल्लक ठेवणे क्रमप्राप्त असल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे करण्यात येणारा पाणी उपसा बंद केला आहे. कळंबा ग्रामपंचायती मार्फत होणारा एक एमएलडी पाणी उपसा बंद केला असून गावातील सार्वजनिक विहिरी बोअरवेलमधून पाणी उपसा करून गावची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे.गतवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने एका आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यावेळी ग्रामस्थ तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावाचे मुख्य जलस्राेत असणारे सात नैसर्गिक नाले तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामात गडप केले असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे. संबंधित प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची गरज निर्माण झाली आहे. -पूनम जाधव, ग्रामपंचायत सदस्या, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस