शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

ऐन पावसाळ्यातही कोल्हापुरातील कळंबा तलाव कोरडाच, अद्यापही पाणीपातळी चार फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:06 IST

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने ...

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने दडी मारून बरीच हुलकावणी दिल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत किंचितही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. आजमितीला पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली असून, तलावपात्राचा वापर विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी होत आहे.पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहतो. तलावपात्रात निव्वळ डेड अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक असून, जलचरांच्या अस्तित्वासाठी ताे शिल्लक ठेवणे क्रमप्राप्त असल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे करण्यात येणारा पाणी उपसा बंद केला आहे. कळंबा ग्रामपंचायती मार्फत होणारा एक एमएलडी पाणी उपसा बंद केला असून गावातील सार्वजनिक विहिरी बोअरवेलमधून पाणी उपसा करून गावची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे.गतवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने एका आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यावेळी ग्रामस्थ तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावाचे मुख्य जलस्राेत असणारे सात नैसर्गिक नाले तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामात गडप केले असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे. संबंधित प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची गरज निर्माण झाली आहे. -पूनम जाधव, ग्रामपंचायत सदस्या, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस