शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ऐन पावसाळ्यातही कोल्हापुरातील कळंबा तलाव कोरडाच, अद्यापही पाणीपातळी चार फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:06 IST

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने ...

कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने दडी मारून बरीच हुलकावणी दिल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत किंचितही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. आजमितीला पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली असून, तलावपात्राचा वापर विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी होत आहे.पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहतो. तलावपात्रात निव्वळ डेड अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक असून, जलचरांच्या अस्तित्वासाठी ताे शिल्लक ठेवणे क्रमप्राप्त असल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे करण्यात येणारा पाणी उपसा बंद केला आहे. कळंबा ग्रामपंचायती मार्फत होणारा एक एमएलडी पाणी उपसा बंद केला असून गावातील सार्वजनिक विहिरी बोअरवेलमधून पाणी उपसा करून गावची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे.गतवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने एका आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यावेळी ग्रामस्थ तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावाचे मुख्य जलस्राेत असणारे सात नैसर्गिक नाले तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामात गडप केले असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे. संबंधित प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची गरज निर्माण झाली आहे. -पूनम जाधव, ग्रामपंचायत सदस्या, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस