शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

Kagal Satara Highway : कागल-सातारा महामार्गावरील टोलची मुदत संपली, तरीही वसुली‌ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:44 IST

सतीश पाटील शिरोली : कागल-सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणाची २० वर्षांची मुदत २ मे २०२२ रोजी संपली आहे. पण पुढील ५३ ...

सतीश पाटीलशिरोली : कागल-सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणाची २० वर्षांची मुदत २ मे २०२२ रोजी संपली आहे. पण पुढील ५३ दिवस रस्ते विकास महामंडळाकडे पथकर वसुली‌ आहे तशीच सुरू राहणार आहे.सन २००२ मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर कागल‌-सातारा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या महामार्गाची पथकर वसुलीची मुदत २० वर्षांची होती. कागल-सातारा चौपदरीकरणाची मे महिन्यात मुदत संपली आहे. पण गेल्या वीस वर्षांत नोटबंदी, कोरोना लॉकडाऊन काळात ५३ दिवस महामार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाला ५३ दिवस पथकर वसुलीसाठी मुदत वाढवून मिळाली आहे.२५ जून २०२२ पर्यंत पथकर वसुली रस्ते विकास महामंडळ करणार आहे.२५ जून नंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे.कागल सातारा सहा पदरीकरणाची निविदा निघेल अशी अपेक्षा होती. पण तांत्रिक त्रुटी मुळे निवीदाच निघालेल्या नाहीत त्यामुळे सहापदरीकरण सुरू होवू शकलेले नाही. आणि चौपदरीकरणाची मुदत संपली आहे. त्यामुळे वाहनधारक  पथकर का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करत आहेत.मार्गाच्या सहापदरीकरणाची निविदा मे महिन्यापर्यंत निघाली नाहीतर या मार्गावरील पथकरात सवलत मिळेल अशी अपेक्षित होते. पण तसे न होता ५३ दिवस पथकर वसुलीची मुदत वाढवून दिली आहे.

कागल-सातारा महामार्गाच्या पथकर वसुलीसाठी ५३ दिवस मुदत वाढ रस्ते विकास महामंडळाला मिळाली आहे.यानंतर हा महामार्ग  रस्ते विकास महामंडळाकडून  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होईल. -वसंत पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग -प्रकल्प व्यवस्थापक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरtollplazaटोलनाका