शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

लोकशाही दिनात महिलांना न्याय

By admin | Updated: May 19, 2015 00:24 IST

वाढता प्रतिसाद : अधिकाऱ्यांकडून योग्य सल्ला, प्रकरणे निकाली निघण्याचे प्रमाण जास्त

कोल्हापूर : घरात नवरा आणि नणंदेकडून होणारा मानसिक, शारीरिक छळ, नवऱ्याच्या संपत्तीत पत्नी म्हणून हवा असलेला अधिकार, स्वत:च्या मुलाने घराबाहेर काढल्याने निर्माण झालेला निवाऱ्याचा प्रश्न, रस्त्यावर बसून साहित्यांची विक्री करताना गाळेधारकांकडून दिला जाणारा त्रास, ठेव मिळावी म्हणून सुरू असलेले प्रयत्न. दैनंदिन जीवनातील अशा असंख्य अडचणींची कैफियत महिलांनी सोमवारी लोकशाही दिनात निर्भीडपणे मांडल्या. गेल्या दोन वर्षात जवळपास ८० टक्के तक्रारदार महिलांना यात न्याय मिळाला आहे.उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी यांनी महिलांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना योग्य तो सल्लाही दिला. दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या दरबारात १२ महिलांनी दाद मागितली. भारतात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने कमी-अधिक प्रमाणात महिलांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते, पण दाद कोणाकडे मागायची, मागितलीच तर न्याय कधी मिळणार अशा अनेक प्रश्नांमुळे महिला तक्रार द्यायलाच पुढे येत नाहीत. महिलांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने एप्रिल २०१३ मध्ये महिला लोकशाही दिनाला सुरुवात केली. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हा दिन आयोजित केला जातो. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या लोकशाही दिनासाठी महसूल, महापालिका, पोलीस प्रशासन अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असतात. आलेल्या अर्जांनुसार एक-एक महिलेला बोलावले जाते आणि तिची कैफियत ऐकली जाते. हा प्रश्न कोणत्या विभागाच्या अखत्यारित येतो हे पाहून त्या विभागाला वर्ग केला जातो. त्याचवेळी आलेल्या महिलेला समुपदेशन आणि तिने पुढे काय करावे, यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान महिला लोकशाही दिनाची सुरुवात झाली. कुरुंदवाडमधून एक मुलगी दाद मागण्यासाठी आली होती. घरात आई-मुलगी दोघीच असल्याने आईने चार वर्षांचा करार करून एका माणसाला जमीन कसण्यासाठी दिली. मुदत संपल्यानंतरही माणूस जमिनीवरचा हक्क सोडायला तयार नाही उलट धमक्या देतोय, शहरातील मध्यवर्ती परिसरात एका दुकानगाळ््यासमोर बसून महिला किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करतेय पण तिला गाळेधारकाने त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पदरात दोन मुलं आहेत व्यवसाय नाही केला तर पोट कसं भरू, असा तिच्यासमोर प्रश्न होता. शिवाजी पेठेतील एका पतसंस्थेत एक महिला आणि मुलीच्या नावावर जवळपास ३ ते ४ लाखांच्या ठेवी आहे. पतसंस्था अवसायनात निघाली आहे. हे अडकलेले पैसे परत मिळावेत, अशी त्यांची मागणी होती. शेत खरेदी करताना एका महिलेची फसवणूक झाली, शेतही गेले आणि पैसेही असा तिचा प्रश्न आहे.बोंद्रे गल्लीत एका महिलेचे मिरची कांडपचे दुकान आहे. आता दोन-तीन शेजाऱ्यांनी परस्पर या दुकानाचा त्रास होतो, अशी तक्रार दाखल केली आहे. या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल यावर सल्ला मागण्यासाठी त्या आल्या होत्या. ( प्रतिनिधी )१०९ पैकी ८५ प्रकरणे निकालीसुरुवातीला या महिला लोकशाही दिनाला महिलांचा अजिबात प्रतिसाद नव्हता. अनेकदा अधिकारी महिलांची वाट पाहून निघून जायचे. आता मात्र अधिकाधिक महिलांपर्यंत ही माहिती पोहोचल्याने या दिवशी मोठ्या संख्येने महिला उपस्थित असतात. गेल्या दोन वर्षांत या दिनात १०९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ८५ प्रकरणे निकाली निघाली आहेत, तर २४ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांचाही लवकर निपटारा केला जावा यासाठी संबंधित विभागाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. महिला लोकशाही दिनात दाखल होणारी प्रकरणे, त्यांचा होणारा निपटारा यामुळे या दिनाला आता महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रलंबित प्रकरणेही तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा - आशिष पुंडपळ, विधि सल्लागार अधिकारीहौसाबार्इंची कहाणीमहिला लोकशाही दिनात दाद मागायला ९५ वय उलटून गेलेल्या हौसाबाई पोवार या आजी आपल्या मुलासोबत आल्या होत्या. आजींना तीन मुले. सर्वांत मोठा मुलगा विलास हे शहीद अशोक कामटेंचे ड्रायव्हर होते. हे कुटुंब मूळचे बाहुबलीजवळील नेज गावातले. येथे पोवार कुटुंबाची बऱ्यापैकी जमीन आहे. ती हौसाबार्इंसह तीन मुलांच्या नावावर होती. मात्र, त्यांच्या लहान मुलाने आईच्या नावचे शेत आणि राहते घरही विकले. काही दिवस त्या धनगरवाड्यात राहिल्या नंतर मोठा मुलगा कोल्हापुरात आला आता तो आईला सांभाळतोय, पण माझे आयुष्य ज्या घरात गेले तिथेच मला मरण यावे यासाठी त्या झगडताहेत.