शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

कोल्हापूरच्या पर्यटनाची 'दिशा'च न ठरल्यानं 'दशा' होण्याची आली वेळ, नुसता घोषणांचाच सुकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:11 IST

कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा.

समीर देशपांडेकोल्हापूर : साडेतीन पीठांपैकी एक पीठ म्हणून करवीर क्षेत्राची देशविदेशात ओळख. कोल्हापूरला देवताळे करू नका असे कुणीही काहीही म्हणत असले तरी अंबाबाईच्या या क्षेत्रामुळेच लाखो भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात हे वास्तव नाकारता येत नाही. परंतु अशा लाखो भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापुरात मूलभूत सुविधाही नाहीत. नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनाबद्दल एक, दोन बैठकातच केलेल्या घोषणा वाचून नागरिक पुन्हा एकदा सुखावले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात समुद्र आणि बर्फ सोडून सगळे आहे असे अभिमानाने सांगितले जाते. परंतु आहे ते टिकवणे, ते पाहण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांना चांगल्या मूलभुत सुविधा देणे, त्यासाठीचे स्पष्ट फलक लावणे आणि कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात फिरायला येणाऱ्यांना सुलभ कसे वावरता येईल याची दक्षता घेण्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि प्रशासन कमी पडले आहे हे मान्य करायला पाहिजे.शाहू महाराजांचे जन्मस्थळ जिथे आम्ही दहा वर्षे पूर्ण करू शकत नाही तिथे बाकीच्या प्रकल्पांची काय कथा. भवानी मंडपातील लाईट अँड साऊंड प्रकल्प कधी प्रत्यक्षात आला नाही. पन्हाळ्यावरील दगडी बांधकामात उभारलेले कन्व्हेन्शन सेंटर अजूनही धूळखातच पडून आहे, पंचगंगा नदी घाटाचे संवर्धन रेखाचित्रामध्येच पाहावे लागत आहे, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा फ्लेक्सवरच राहिला आहे. मग कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा.

खड्ड्यांवरून पुढारी, अधिकाऱ्यांचा उद्धारयंदा पावसाळा लांबायला आणि दिवाळी यायला एकच वेळ आली. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे दर्शन पर्यटकांना झाले. कोरोनानंतर पहिल्यांदाच अशी दिवाळी आल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापूरला आले. तेथून कोकणाकडे गेले. परंतु परत आपल्या घरी जाताना कोल्हापूरचे नेते आणि अधिकाऱ्यांचा उद्धार करत गेले एवढे मात्र निश्चित. बिंदू चौकातील पार्किंगच्या ठिकाणी अर्धा तास थांबून जर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असत्या तर खड्ड्यांमुळे कोल्हापूर प्रतिमा बाहेर किती वाईट झाली आहे याचा अंदाज आला असता.

धड रस्ते आणि स्वच्छतागृहे हवीतच

हॉटेल व्यवसायातील एक ज्येष्ठ व्यावसायिक म्हणाले, कोल्हापूरचे पर्यटन वाढावे म्हणून नेत्यांनी काहीही घोषणा करू नयेत. कोल्हापूरचे रस्ते नीट ठेवले आणि महिलांसह सर्वांसाठी एक चांगली १० स्वच्छतागृहे उभारली तरी कोल्हापूरबद्दल एक चांगला संदेश बाहेर जाईल.

नैसर्गिक कुचंबणागेल्याच आठवड्यात कोल्हापूरमधील एक आर्किटेक्ट आपल्या परदेशातील पाहुण्यांना घेऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या परदेशी पाहुण्यांना स्वच्छतागृहाची गरज भासली. तेव्हा माझी फार मोठी फजिती झाल्याचे त्यांनी सांगितले. याच अडचणी सर्वसामान्य नागरिक, पर्यटकांना रोज येत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन