शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

कोल्हापूरच्या पर्यटनाची 'दिशा'च न ठरल्यानं 'दशा' होण्याची आली वेळ, नुसता घोषणांचाच सुकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:11 IST

कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा.

समीर देशपांडेकोल्हापूर : साडेतीन पीठांपैकी एक पीठ म्हणून करवीर क्षेत्राची देशविदेशात ओळख. कोल्हापूरला देवताळे करू नका असे कुणीही काहीही म्हणत असले तरी अंबाबाईच्या या क्षेत्रामुळेच लाखो भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात हे वास्तव नाकारता येत नाही. परंतु अशा लाखो भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापुरात मूलभूत सुविधाही नाहीत. नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनाबद्दल एक, दोन बैठकातच केलेल्या घोषणा वाचून नागरिक पुन्हा एकदा सुखावले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात समुद्र आणि बर्फ सोडून सगळे आहे असे अभिमानाने सांगितले जाते. परंतु आहे ते टिकवणे, ते पाहण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांना चांगल्या मूलभुत सुविधा देणे, त्यासाठीचे स्पष्ट फलक लावणे आणि कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात फिरायला येणाऱ्यांना सुलभ कसे वावरता येईल याची दक्षता घेण्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि प्रशासन कमी पडले आहे हे मान्य करायला पाहिजे.शाहू महाराजांचे जन्मस्थळ जिथे आम्ही दहा वर्षे पूर्ण करू शकत नाही तिथे बाकीच्या प्रकल्पांची काय कथा. भवानी मंडपातील लाईट अँड साऊंड प्रकल्प कधी प्रत्यक्षात आला नाही. पन्हाळ्यावरील दगडी बांधकामात उभारलेले कन्व्हेन्शन सेंटर अजूनही धूळखातच पडून आहे, पंचगंगा नदी घाटाचे संवर्धन रेखाचित्रामध्येच पाहावे लागत आहे, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा फ्लेक्सवरच राहिला आहे. मग कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा.

खड्ड्यांवरून पुढारी, अधिकाऱ्यांचा उद्धारयंदा पावसाळा लांबायला आणि दिवाळी यायला एकच वेळ आली. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे दर्शन पर्यटकांना झाले. कोरोनानंतर पहिल्यांदाच अशी दिवाळी आल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापूरला आले. तेथून कोकणाकडे गेले. परंतु परत आपल्या घरी जाताना कोल्हापूरचे नेते आणि अधिकाऱ्यांचा उद्धार करत गेले एवढे मात्र निश्चित. बिंदू चौकातील पार्किंगच्या ठिकाणी अर्धा तास थांबून जर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असत्या तर खड्ड्यांमुळे कोल्हापूर प्रतिमा बाहेर किती वाईट झाली आहे याचा अंदाज आला असता.

धड रस्ते आणि स्वच्छतागृहे हवीतच

हॉटेल व्यवसायातील एक ज्येष्ठ व्यावसायिक म्हणाले, कोल्हापूरचे पर्यटन वाढावे म्हणून नेत्यांनी काहीही घोषणा करू नयेत. कोल्हापूरचे रस्ते नीट ठेवले आणि महिलांसह सर्वांसाठी एक चांगली १० स्वच्छतागृहे उभारली तरी कोल्हापूरबद्दल एक चांगला संदेश बाहेर जाईल.

नैसर्गिक कुचंबणागेल्याच आठवड्यात कोल्हापूरमधील एक आर्किटेक्ट आपल्या परदेशातील पाहुण्यांना घेऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या परदेशी पाहुण्यांना स्वच्छतागृहाची गरज भासली. तेव्हा माझी फार मोठी फजिती झाल्याचे त्यांनी सांगितले. याच अडचणी सर्वसामान्य नागरिक, पर्यटकांना रोज येत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन