शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गूळ सौदे बंदच; शेतकऱ्यांचे नुकसान : बाजार समितीत तिसºया दिवशीही वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:55 IST

कोल्हापूर : व्यापारी व माथाडी यांच्यातील गुळाची गाडी भरण्याच्या वेळेवरून सुरू असलेला वाद चिघळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ ...

ठळक मुद्देदोन कोटींचे रवे पडून; मार्केट चोवीस तास सुरू ठेवा

कोल्हापूर : व्यापारी व माथाडी यांच्यातील गुळाची गाडी भरण्याच्या वेळेवरून सुरू असलेला वाद चिघळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ सौदे गुरुवारी तिसºया दिवशीही बंद राहिले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुमारे दोन कोटींचे जवळपास ४० हजार रवे बाजार समितीमध्ये पडून आहेत.दरम्यान, गुरुवारी गूळ उत्पादक शेतकºयांच्या व्यापक शिष्टमंडळाने बाजार समिती प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले. हंगाम अंतिम टप्प्यात असताना या वादात गुळाचे दर पाडले जात असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. त्याकरिता वेळेचे बंधन न घालता २४ तास गुळाची आवक व जावक सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीमध्ये गूळ व्यापारी व माथाडी यांच्यात वेळेवरून वाद सुरू आहे. सोमवारी (दि. १८) सहा व्यापाºयांनी माथाडींकडून एक तास जादा काम करून घेतले. त्यातून माथाडी कामगारांनी बुधवारी (दि. २०) तिरूपती ट्रेडर्स, अजितकुमार नवरलाल शहा, पद्मावती ट्रेडिंग कंपनी, रावळ एंटरप्रायजेस, जे. के. ट्रेडर्स व खोडीदास नेमचंद शहा या सहा व्यापाºयांचे सौदे काढले नाहीत. या व्यापाºयांचा माथाडींशी पुन्हा जोरात वाद झाला. दुपारनंतर सौदे काढण्यास माथाडी तयार झाले; परंतु माथाडी या सहा व्यापाºयांकडे आलेच नाहीत; त्यामुळे चिडून गुरुवारी या व्यापाºयांनी गूळ सौदे बंद ठेवले. व्यापारी व माथाडी आपापल्या भूमिकेशी ठाम असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

या वादाचा फटका बसल्याने संतप्त झालेल्या गूळ उत्पादक शेतकºयांनी गुुरुवारी थेट बाजार समितीत येऊन प्रशासनाला जाब विचारला. नुकसान टाळण्यासाठी २४ तास गुळाची आवक-जावक सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.शिष्टमंडळात भगवान काटे, सागर चौगुले, अजित पाटील, संतोष तोरसे, सुवर्णसिंग किल्लेदार, अमित पाटील, विजय लाड, संजय कांबळे, सचिन जाधव, श्रीपती कळके, आदींसह तुरंबे, तळाशी, खुपीरे, पोर्ले, अर्जुनवाडा, वाघापूर, कोलोली, फुलेवाडी, माजगाव, भुयेवाडी, लाडवाडी, तिरपण येथील गूळ उत्पादक शेतकºयांचा समावेश होता.वादावर आज बैठकसौदे बंद राहिल्याने शेतकºयांचे नुकसान होत असल्याने सचिव मोहन सालपे यांनी आज, शुक्रवारी एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.गुरुवारी पाच व १० किलोच्या गुळाचे सौदे बंद राहिले. असे असले तरी एक किलो गुळाच्या १० हजार बॉक्सचे सौदे काढण्यात आले.

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर