शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

Kolhapur News: जोतिबा विकास आराखडे डोंगरावरच; कागदावर ३०० कोटी, मिळाले अडीच कोटी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 6, 2023 11:55 IST

आजही मंदिर व डोंगराची स्थिती जैसे थे. मग गेल्या तीस वर्षांत काय विकास साधला

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी-रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरासह डोंगराच्या विकासाचे आजवर झालेले आराखडे फार्सच ठरले आहे. कोल्हापूरपासून २२ किलोमीटर असलेले हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे व अंबाबाईनंतर सर्वाधिक भाविकांची मांदियाळी असणारे मंदिर आहे. पण आजही येथे पिण्याचे पाणी, यात्रीनिवास, स्वच्छतागृह, सुसज्ज पार्किंग, अन्नछत्र, स्वच्छतेचा अभाव, ड्रेनेज, गटर्स अशा मूलभूूत सुविधांची वानवा आहे. आता जोतिबा विकास प्राधिकरणाअंतर्गत डोंगराचा विकास करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जोतिबा डोंगर विकासाच्या आजवर झालेल्या आराखड्यांचा प्रवास आणि वस्तुस्थिती मांडणारी मालिका आजपासून...इंदुमती गणेशकोल्हापूर : जोतिबा मंदिर विकासासाठी १९९१ मध्ये पहिल्यांदा आराखडा करण्यात आला, तेव्हापासून आजतागायत चार आराखडे झाले. ज्याची रक्कम ३०० कोटींवर जाते. त्यापैकी प्रत्यक्षात फक्त अडीच कोटी रुपये देवाच्या पदरात पडले आहेत. गेल्या तीस वर्षांत ना तेथील गैरसोयी कमी झाल्या आहेत, ना भाविकांना सोयी-सुविधा मिळाल्या, ना गावची स्थिती सुधारली आहे. आजही मंदिर व डोंगराची स्थिती जैसे थे आहे. मग गेल्या तीस वर्षांत काय विकास साधला, याचा लेखाजोखा मांडण्याची गरज आहे.कोल्हापुरातील श्री अंबाबाईनंतर जोतिबा हे सर्वात मोठे देवस्थान आहे. चैत्र महिन्यातील तीनदिवसीय यात्रेसाठी किमान ७ ते ८ लाख भाविक डोेंगरावर येतात. याशिवाय दर रविवार, श्रावण षष्ठी, खेटे असा वर्षभर भाविकांचा येथे राबता असतो. त्यामुळे वर्षाकाठी किमान २५ ते ३० लाख भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. येथे देवाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या भाविकांना सेवा-सुविधा मिळाव्यात, यासाठी १९९०-९१ मध्ये डोंगर विकासाचा १४५ कोटींचा आराखडा करण्यात आला.त्यावेळी नेमकी किती रक्कम आराखड्यासाठी वापरली गेली, याची आत्ता माहिती मिळाली नाही. पण त्या आराखड्यात डोंगरावर दर्शन मंडप, सांडपाणी व्यवस्थापन, ड्रेनेज व गटर्स सिस्टीमला प्राधान्य देण्यात आले होते. पण प्रत्यक्ष आराखडा राबवताना झाले उलटेच. परिसराचा विकास तर झालाच नाही, पण त्या रकमेतून बांधलेल्या सेंट्रल प्लाझाची आणि पार्किंगमधील दुकानगाळ्यांवर खर्च केलेला निधी वाया गेला.त्यानंतर चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते, त्यावेळी म्हणजे २०१७ मध्ये पुन्हा विकास आराखड्याचा विषय निघाला. त्यांनी त्यांच्या स्टाईलने मोठ्या घोषणा केल्या, परंतू पुढे काहीच झाले नाही. त्यावेळी जुन्याच आराखड्यामध्ये दुरुस्त्या सुचवून नवीन १५५ कोटींचा आराखडा केला गेला. त्यातील फक्त २५ कोटींच्या प्राथमिक कामांना मंजुरी दिली गेली. तत्कालीन पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी मनात आणले असते, तर नवे मंदिर ते उभारू शकले असते, परंतू त्यांनीही चैत्र यात्रेला जाऊन सासनकाठी पूजन करण्यापलीकडे काय केले नाही.

आराखड्यांचा प्रवास असासाल : रक्कम : प्रस्तावित कामे१९९०-१९ : १४५ कोटी : दर्शन मंडप, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा.२०१७ : १५५ कोटी : दर्शन मंडप, भूमिगत विद्युत व्यवस्था, यात्री निवास, पालखी सोहळ्यासाठी सेंट्रल प्लाझा, स्वच्छतागृह, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन.२०१८ : ८० कोटी : १५५ काेटींच्या आराखड्याची फोड करून तो ८० कोटींचा करण्यात आला. पण एकदम ८० कोटी देता येणार नाहीत, म्हणून आणखी कमी रकमेचा आराखडा करा, असे सांगण्यात आले. अखेर देवस्थान समितीने २५ कोटींचा विकास आराखडा पाठवला त्याला मंजुरी देण्यात आली.

अडीच कोटी गेले जिल्हा परिषदेला...२०१७ मध्ये मंजूर झालेल्या २५ कोटींच्या आराखड्यातील फक्त ५ कोटी शासनाने पाठवले. त्यापैकी अडीच कोटी रुपये देवस्थानला मिळाले. यातून दर्शन मंडप आणि टॉयलेट कॉम्प्लेक्सचे काम सुरू केले. अडीच कोटी जिल्हा परिषदेला भूमिगत विद्युत वायरिंग व पाणी पुरवठ्यासाठी देण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा