शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा चैत्र यात्रा: सासनकाठ्या पूजनावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:55 IST

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली.

कोल्हापूर : कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर दोन वर्षांनी श्री जोतिबा यात्रा होत असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी मानाच्या सासनकाठ्यांच्या पूजनावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत संदेशाची देवाणघेवाण करता येण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टिमसह पर्यायी संदेश व्यवस्था तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केल्या. यावेळी त्यांनी दर्शन मंडप व मंदिर परिसराची पाहणी केली.

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस विभागाच्या तयारीची माहिती दिली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या तयारीबाबत, सचिव शिवराज नाईकवाडे यांनी देवस्थान समितीच्या तयारीची माहिती दिली. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, पोलीस अधिकारी रवींद्र साळोखे, तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सरपंच राधा बुणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी रेखावार यांनी बजावले..

  • डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका.
  • भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, बसवाहतूक, पार्किंग, आरोग्य सोयी- सुविधा पुरवा.
  • रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडेझुडपे, रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून घ्या.
  • डोंगरावरील अंतर्गत रस्ते, वाहनतळ मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करा.
  • दर्शन रांग मार्गाची तसेच चालत जाण्याच्या मार्गावर दगड, खडी येऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता दुरुस्ती करुन घ्यावी.
  • भाविकांना पिण्याचे पाणी अपुरे पडू नये, यासाठी जादा क्षमतेचे पाण्याचे टँकर पुरवा.
  • फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करुन घ्या. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पंप सुस्थितीत असल्याची खात्री करा. 

रस्त्यावर गाड्या लागणार नाहीत...दर्शन मंडप उभारणी व मंदिर परिसराची पाहणी केल्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास सहजपणे बाहेर पडता येण्यासाठी रस्त्यावर गाड्या लावण्यात येणार नाहीत, याची दक्षता घेऊन वाहनतळाची व्यवस्था करावी. दुचाकी, चारचाकी वाहनतळ, दर्शन मार्ग, बाहेर पडण्याचा मार्गाचे माहितीफलक त्या त्या ठिकाणी लावण्यात यावेत. रुग्णवाहिका तैनात ठेवावी. आगीपासून सुरक्षेसाठी व्यावसायिक व स्थानिकांनी आग प्रतिबंधक नळकांडी ठेवून खबरदारी घ्यावी. भेसळयुक्त अन्न पदार्थ व भेसळयुक्त गुलालाची विक्री होणार नाही याची काळजी घ्या. यात्रेनंतर डोंगर परिसरात कचरा राहू नये तसेच दुर्गंधी होऊ नये यासाठी स्वच्छता, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाPoliceपोलिस