शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

जोतिबा चैत्र यात्रा: सासनकाठ्या पूजनावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:55 IST

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली.

कोल्हापूर : कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर दोन वर्षांनी श्री जोतिबा यात्रा होत असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी मानाच्या सासनकाठ्यांच्या पूजनावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत संदेशाची देवाणघेवाण करता येण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टिमसह पर्यायी संदेश व्यवस्था तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केल्या. यावेळी त्यांनी दर्शन मंडप व मंदिर परिसराची पाहणी केली.

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस विभागाच्या तयारीची माहिती दिली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या तयारीबाबत, सचिव शिवराज नाईकवाडे यांनी देवस्थान समितीच्या तयारीची माहिती दिली. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, पोलीस अधिकारी रवींद्र साळोखे, तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सरपंच राधा बुणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी रेखावार यांनी बजावले..

  • डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका.
  • भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, बसवाहतूक, पार्किंग, आरोग्य सोयी- सुविधा पुरवा.
  • रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडेझुडपे, रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून घ्या.
  • डोंगरावरील अंतर्गत रस्ते, वाहनतळ मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करा.
  • दर्शन रांग मार्गाची तसेच चालत जाण्याच्या मार्गावर दगड, खडी येऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता दुरुस्ती करुन घ्यावी.
  • भाविकांना पिण्याचे पाणी अपुरे पडू नये, यासाठी जादा क्षमतेचे पाण्याचे टँकर पुरवा.
  • फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करुन घ्या. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पंप सुस्थितीत असल्याची खात्री करा. 

रस्त्यावर गाड्या लागणार नाहीत...दर्शन मंडप उभारणी व मंदिर परिसराची पाहणी केल्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास सहजपणे बाहेर पडता येण्यासाठी रस्त्यावर गाड्या लावण्यात येणार नाहीत, याची दक्षता घेऊन वाहनतळाची व्यवस्था करावी. दुचाकी, चारचाकी वाहनतळ, दर्शन मार्ग, बाहेर पडण्याचा मार्गाचे माहितीफलक त्या त्या ठिकाणी लावण्यात यावेत. रुग्णवाहिका तैनात ठेवावी. आगीपासून सुरक्षेसाठी व्यावसायिक व स्थानिकांनी आग प्रतिबंधक नळकांडी ठेवून खबरदारी घ्यावी. भेसळयुक्त अन्न पदार्थ व भेसळयुक्त गुलालाची विक्री होणार नाही याची काळजी घ्या. यात्रेनंतर डोंगर परिसरात कचरा राहू नये तसेच दुर्गंधी होऊ नये यासाठी स्वच्छता, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाPoliceपोलिस