शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

पर्यायी पुलाचे काम पावसाळ्यानंतरच संयुक्त बैठकीत स्पष्ट : कृती समिती आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनास टाळे ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:00 IST

कोल्हापूर : पुरातत्व कायद्यास संसदेत मंजुरी मिळाल्याशिवाय येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलास पर्यायी पुलाचे रखडलेले काम सुरू करणे शक्य नाही. ही मंजुरी मिळाल्यावर पावसाळ्यानंतरच हे काम सुरू होईल हे

कोल्हापूर : पुरातत्व कायद्यास संसदेत मंजुरी मिळाल्याशिवाय येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलास पर्यायी पुलाचे रखडलेले काम सुरू करणे शक्य नाही. ही मंजुरी मिळाल्यावर पावसाळ्यानंतरच हे काम सुरू होईल हे सोमवारी येथे जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने हे काम तातडीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाºयांना धारेवर धरले; परंतु त्यांनी प्रशासन म्हणून आम्ही जे प्रयत्न करणे आवश्यक होते ते सर्व केले असून आपत्ती व्यवस्थापनातूनही ‘तातडीचे काम’ म्हणून कायद्याने हे काम करता येत नसल्याचे सांगितले. राष्ट्रपतींनी वटहुकूम काढणे हा एक पर्याय आहे, त्याचाही विचार व्हावा, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सुचविले.कृती समितीने शनिवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हे काम सुरू करण्याचा आग्रह धरला होता तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाºयांसमवेत बैठक घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार ही बैठक झाली. त्यास महापौर स्वाती यवलुजे, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, कृती समितीचे बाबा पार्टे, संभाजीराव जगदाळे, दिलीप पवार, अशोक पोवार, अजित सासने, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, राजेश लाटकर, जहिदा मुजावर, किशोर घाटगे, सुरेश जरग, चंद्रकांत बराले, श्रीकांत भोसले, रमेश मोरे आदी उपस्थित होते. सुमारे तासभर ही चर्चा झाली परंतु त्यातून काहीच ठोस निष्पन्न झाले नाही.प्रशासनाने काय प्रयत्न केले..?१) ‘आपत्ती व्यवस्थापन’ म्हणून तातडीचे काम म्हणून पुलाची दुरुस्ती करता येईल का, अशी विचारणा जिल्हा सरकारी वकिलांकडे करण्यात आली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनांतून तात्पुरत्या दुरुस्तीची कामे करता येतात, नव्याने कायमस्वरूपी बांधकाम करता येत नसल्याचे कळविले.२) राज्य शासनाचे पुरातत्त्व संचालक व विधि आणि न्याय विभागाकडेही बांधकाम करण्याबाबत सल्ला मागविण्यात आला. त्यांनी कायद्याने असे काम सुरू करता येणार नसल्याचे लेखी कळविले. ३) नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षित स्मारके विभागाच्या सदस्य सचिवांशीही पत्रव्यवहार केला परंतु त्यांच्याकडूनही संमती मिळू शकलेली नाही.मी रजेवर जातो..कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काही करून हे काम सुरू कराच, असा आग्रह धरल्यावर जिल्हाधिकारी चांगलेच संतप्त झाले. पुलाचे काम लवकर व्हावे अशीच जिल्हा प्रशासन म्हणून माझी भूमिका आहे; परंतु जे काम करण्याचे अधिकार मलाही नाहीत, ते तुम्ही कराच म्हणून दबाव टाकत असाल तर मला ते शक्य नाही. त्यामुळे हवे तर मी रजेवर जातो, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.पर्यायी पुलाचे काम १० डिसेंबर २०१५ पासून बंद आहे. पुलापासून शंभर मीटरवर ब्रह्मपुरी टेकडी येते. ही टेकडी पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येत असल्याने पुरातत्त्व विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही, अशी हरकत त्या विभागाने घेतल्यावर हे काम थांबले.संरक्षित स्मारके आणि पुरातत्त्व स्थळ, घटना दुरुस्ती कायदा हा १९५८ चा आहे. त्यात सन २०१७ च्या कायद्यान्वये दुरुस्ती सुचविली आहे. केंद्र सरकारने निधी पुरविलेल्या सार्वजनिक हिताच्या कामांना या कायद्यातून मुभा द्यावी, अशी दुरुस्ती केली असून त्यास लोकसभेने मंजुरी दिली आहे, परंतु राज्यसभेने मंजुरी न दिल्याने कायदाच लटकला आहे. त्यामुळे या पुलाचे कामही रखडले आहे.४त्यातच २६ जानेवारीस पहाटे पुलावरून मिनीबस कोसळून अपघात झाल्यानंतर या पुलावरील अवजड वाहतूक बंद आहे. कायद्यातील दुरुस्तीसही नवी दिल्लीतील ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी विरोध केल्यामुळे त्यास लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता धूसर आहे. देशभरात या कायद्याच्या कक्षेत येणारी ३६०० स्मारके आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग