शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चोरीतील साडेबारा लाखांचे दागिने, मोबाइल परत; आरोपीला केली अटक

By उद्धव गोडसे | Updated: December 13, 2023 14:51 IST

कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील १५० ग्रॅम दागिने परत, फिर्यादींना मिळाला दिलासा

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील १५० ग्रॅम दागिने आणि ठिकठिकाणी गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेऊन ते फिर्यादींना परत करण्याचे काम करवीर पोलिसांनी बुधवारी (दि. १३) केले. साडेतीन लाख रुपयांचे ३५ मोबाइल आणि नऊ लाख रुपयांचे दागिने परत मिळाल्याने फिर्यादींना दिलासा मिळाला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत मुद्देमाल परत करण्यात आला.

कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील पसार दरोडेखोर अंकित शर्मा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून, त्याच्याकडून दरोड्यातील १५० ग्रॅम दागिने जप्त केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर हे दागिने बुधवारी कात्यायनी ज्वेलर्सचे मालक रमेश शंकर माळी (रा. बालिंगा) यांना परत करण्यात आले. करवीर पोलिसांनी गेल्या महिनाभरात सायबर पोलिसांच्या मदतीने गहाळ मोबाइलचा शोध घेण्याची मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून ३५ मोबाइलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सुमारे साडेतीन लाख रुपयांचे मोबाइल आणि नऊ लाखांचे दागिने असा साडेबारा लाखांचा मुद्देमाल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते परत करण्यात आला.

जिल्ह्यातील घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मुद्देमाल परत मिळविण्यास प्राधान्य दिले जात आहे. फिर्यादींना त्यांचा ऐवज, मुद्देमाल परत मिळावा, यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे निरीक्षक अरविंद काळे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस