शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जयसिंगपूर : हे सातशे विद्यार्थी एसटीने करतात 'फ्री 'प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:50 IST

संदीप बावचे। जयसिंगपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत पास योजनेची अंमलबजावणी शिरोळ ...

ठळक मुद्देशिरोळ तालुका : नांदणी, नृसिंहवाडी सर्कलमध्ये दुष्काळसदृश योजनेची अंमलबजावणी

संदीप बावचे।जयसिंगपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत पास योजनेची अंमलबजावणी शिरोळ तालुक्यात सुरू झाली आहे. नांदणी व नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मोफत पास योजनेचा लाभ घेतला आहे. जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून पास काढत आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. अन्य शासकीय ज्या सवलती आहेत, त्यांचीही अंमलबजावणी करावी, अशी मागणी या दोन सर्कलमधील गावातील नागरिकांतून होत आहे.

तालुक्यातील ज्या महसुली मंडळांमध्ये सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान साडेसातशे मिलिमीटरपेक्षा कमी झाला आहे अशा महसुली मंडळातील गावांत दुष्काळ घोषित करून शासनाने सुमारे आठ सवलती जाहीर केल्या आहेत. शिरोळ तालुक्यात एस. टी. विभागाने ही सवलत सुरू करून आपली कार्यवाही केली आहे.

शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये राज्य परिवहन विभागातर्फे ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. दुष्काळसदृश म्हणून घोषित केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत येणाºया औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी व बस्तवाड, तर नांदणी सर्कल अंतर्गत नांदणी, हरोली, जांभळी, धरणगुत्ती, चिपरी, कोंडिग्रे, निमशिरगांव, तमदलगे, गावांतील विद्यार्थ्यांना मोफत एस. टी. पास योजनेचा लाभ मिळाला आहेदुष्काळसदृश अंतर्गत सवलतीजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषीपंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा सवलतींचा समावेश आहे. नांदणी व नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत दुष्काळसदृश म्हणून शासनाने सवलती जाहीर केल्या आहेत.

अंमलबजावणीची गरजराज्य शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता. याव्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यांतील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कमी पर्जन्यमान झालेल्या ठिकाणी दुष्काळ घोषित केला आहे. याचा फायदा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी व नांदणी महसुली मंडळाला झाला आहे. त्यामुळे आठ सवलतींचा फायदा या सर्कलमधील महसुली गावांना होणार आहे. या सवलतींची देखील अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय