शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

जयसिंगपूर पालिकेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी

By admin | Updated: March 10, 2016 23:56 IST

निवडणूक आठ महिन्यांवर : विकासकामांतून निवडणुकीचा नारळ फुटला

संदीप बावचे-- जयसिंगपूर -शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने १०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा संकल्प करून औपचारिकरीत्या आगामी नगरपालिका निवडणुकीचा नारळ फोडला आहे़ विरोधी आघाडीची मोट कशी बांधण्यात येते, यावरच निवडणुकीत रंग भरणार आहे़ निवडणुका आठ महिन्यांवर असल्या तरी सत्ताधारी गटाने डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे़मतदार नोंदणी अभियानानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे़ येत्या जून-जुलैमध्ये प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे़ डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे़ त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्येच पालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे़नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने विकासाची गती वाढवून तब्बल १०० कोटींची विकासकामे करण्याची घोषणा केली आहे़ भुयारी गटार योजनेसाठी सुमारे दहा कोटी रुपये, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, तसेच म्युझियमसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याबरोबर रस्ते, पाणी योजनेच्या कामांना गती देण्यासाठी निधीचे नियोजन करण्यात आले आहे़ एकूणच शताब्दी वर्षाचा मुहूर्त साधून सत्ताधारी आघाडीने आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़ विरोधकांची मोट बांधली जाणार, हे गृहीत धरूनच विकासकामांतून त्यांना उत्तर द्यायचे, अशी तयारी सत्ताधारी गटाकडून सुरू असल्याचे दिसून येते. येणाऱ्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका तसेच शिवसेना, भाजप, शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कोणता निर्णय घेतील, यावरच विरोधी आघाडीची मोट बांधली जाणार आहे़ कोल्हापूर महापालिकेप्रमाणे पक्षीय चिन्हांवर निवडणुका लढल्या जातील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीनंतर गोकुळ दूध संघ, केडीसीसी बँक आणि विधान परिषद या निवडणुकीतून राजकारणाचा तालुक्यात बराच ऊहापोह झाला आहे़ यामुळे आगामी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक विविध कारणांनी गाजणार, हे मात्र निश्चित असले तरी सत्ताधारी आघाडीने विकासकामांतून नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आतापासून प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल़विकास साधण्याचे आव्हानशताब्दी वर्षामध्ये जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीसमोर आहे़ गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आघाडीला यश आले आहे़ अवघ्या आठ महिन्यांवर आलेल्या पंचवार्षिक निवडणुका लक्षात घेऊन आतापासूनच आघाडीकडून व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे़