शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर पालिकेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी

By admin | Updated: March 10, 2016 23:56 IST

निवडणूक आठ महिन्यांवर : विकासकामांतून निवडणुकीचा नारळ फुटला

संदीप बावचे-- जयसिंगपूर -शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने १०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा संकल्प करून औपचारिकरीत्या आगामी नगरपालिका निवडणुकीचा नारळ फोडला आहे़ विरोधी आघाडीची मोट कशी बांधण्यात येते, यावरच निवडणुकीत रंग भरणार आहे़ निवडणुका आठ महिन्यांवर असल्या तरी सत्ताधारी गटाने डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे़मतदार नोंदणी अभियानानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे़ येत्या जून-जुलैमध्ये प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे़ डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे़ त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्येच पालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे़नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने विकासाची गती वाढवून तब्बल १०० कोटींची विकासकामे करण्याची घोषणा केली आहे़ भुयारी गटार योजनेसाठी सुमारे दहा कोटी रुपये, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, तसेच म्युझियमसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याबरोबर रस्ते, पाणी योजनेच्या कामांना गती देण्यासाठी निधीचे नियोजन करण्यात आले आहे़ एकूणच शताब्दी वर्षाचा मुहूर्त साधून सत्ताधारी आघाडीने आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़ विरोधकांची मोट बांधली जाणार, हे गृहीत धरूनच विकासकामांतून त्यांना उत्तर द्यायचे, अशी तयारी सत्ताधारी गटाकडून सुरू असल्याचे दिसून येते. येणाऱ्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका तसेच शिवसेना, भाजप, शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कोणता निर्णय घेतील, यावरच विरोधी आघाडीची मोट बांधली जाणार आहे़ कोल्हापूर महापालिकेप्रमाणे पक्षीय चिन्हांवर निवडणुका लढल्या जातील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीनंतर गोकुळ दूध संघ, केडीसीसी बँक आणि विधान परिषद या निवडणुकीतून राजकारणाचा तालुक्यात बराच ऊहापोह झाला आहे़ यामुळे आगामी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक विविध कारणांनी गाजणार, हे मात्र निश्चित असले तरी सत्ताधारी आघाडीने विकासकामांतून नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आतापासून प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल़विकास साधण्याचे आव्हानशताब्दी वर्षामध्ये जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीसमोर आहे़ गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आघाडीला यश आले आहे़ अवघ्या आठ महिन्यांवर आलेल्या पंचवार्षिक निवडणुका लक्षात घेऊन आतापासूनच आघाडीकडून व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे़