शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

जयसिंगपूर पालिकेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी

By admin | Updated: March 10, 2016 23:56 IST

निवडणूक आठ महिन्यांवर : विकासकामांतून निवडणुकीचा नारळ फुटला

संदीप बावचे-- जयसिंगपूर -शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने १०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा संकल्प करून औपचारिकरीत्या आगामी नगरपालिका निवडणुकीचा नारळ फोडला आहे़ विरोधी आघाडीची मोट कशी बांधण्यात येते, यावरच निवडणुकीत रंग भरणार आहे़ निवडणुका आठ महिन्यांवर असल्या तरी सत्ताधारी गटाने डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे़मतदार नोंदणी अभियानानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे़ येत्या जून-जुलैमध्ये प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे़ डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे़ त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्येच पालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे़नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने विकासाची गती वाढवून तब्बल १०० कोटींची विकासकामे करण्याची घोषणा केली आहे़ भुयारी गटार योजनेसाठी सुमारे दहा कोटी रुपये, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, तसेच म्युझियमसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याबरोबर रस्ते, पाणी योजनेच्या कामांना गती देण्यासाठी निधीचे नियोजन करण्यात आले आहे़ एकूणच शताब्दी वर्षाचा मुहूर्त साधून सत्ताधारी आघाडीने आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़ विरोधकांची मोट बांधली जाणार, हे गृहीत धरूनच विकासकामांतून त्यांना उत्तर द्यायचे, अशी तयारी सत्ताधारी गटाकडून सुरू असल्याचे दिसून येते. येणाऱ्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका तसेच शिवसेना, भाजप, शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कोणता निर्णय घेतील, यावरच विरोधी आघाडीची मोट बांधली जाणार आहे़ कोल्हापूर महापालिकेप्रमाणे पक्षीय चिन्हांवर निवडणुका लढल्या जातील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीनंतर गोकुळ दूध संघ, केडीसीसी बँक आणि विधान परिषद या निवडणुकीतून राजकारणाचा तालुक्यात बराच ऊहापोह झाला आहे़ यामुळे आगामी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक विविध कारणांनी गाजणार, हे मात्र निश्चित असले तरी सत्ताधारी आघाडीने विकासकामांतून नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आतापासून प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल़विकास साधण्याचे आव्हानशताब्दी वर्षामध्ये जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीसमोर आहे़ गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आघाडीला यश आले आहे़ अवघ्या आठ महिन्यांवर आलेल्या पंचवार्षिक निवडणुका लक्षात घेऊन आतापासूनच आघाडीकडून व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे़