शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जयंती नाला पंचगंगेत, ‘एसटीपी’ अद्याप बंदच

By admin | Published: June 07, 2015 1:05 AM

बंधाराही कुचकामी : ‘मनपा’ची डोकेदुखी वाढली

कोल्हापूर : महापालिकेने तीन दिवसांपूर्वी जयंती नाल्यातील दूषित पाणी तटविण्यासाठी बंधाऱ्यावर खरमातीची ठेवलेली पोती पुन्हा पावसामुळे वाहून गेली. यातच कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रच बंद असल्याने जयंती नाला पुन्हा ‘ओव्हर फ्लो’ झाला. जयंती नाल्यातील दूषित पाण्यावरून आंदोलन व प्रदूषण मंडळाच्या नोटिसींचा महापालिकेवर धडका सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच नाला नदीत मिसळल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. मैलामिश्रित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शहरात गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जयंती नाला नेहमीप्रमाणे ओसंडून वाहून पंचगंगा नदीत मिसळत आहे. तीन दिवसांपूर्वी महापालिकेने नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी ठेवलेली वाळू, मातीची पोती या पावसाच्या तडाख्यात वाहून गेली. परिणामी, गेल्या ४८ तासांत शहरातील मैलामिश्रितसांडपाणी प्रक्रियेविनाच नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. चार महिन्यांत जयंती नाल्यातील सांडपाणी थेट नदीत मिसळण्याचा प्रकार अनेकवेळा घडला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना ऐन पाावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्याने नाला नदीत मिसळत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. जयंती नाल्यातील पाणी हलक्याशा पावसातही नदीत मिसळत असल्याने बंधाऱ्यावर पोत्यात माती, वाळू भरून बंधाऱ्याची उंची तात्पुरती वाढविण्याचा दोनवेळा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा ही पोती पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही सांडपाण्याचा प्रवाह नदीत मिसळणे सुरूच राहिले. (प्रतिनिधी)