शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जयप्रभा स्टुडिओ जाणार महापालिकेच्या ताब्यात, राजेश क्षीरसागर यांची माहिती 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 5, 2023 17:04 IST

अखेर दीड वर्षाने राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले

कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता व चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेच्या पर्यायाने राज्य शासनाच्या ताब्यात राहणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जयप्रभा स्टुडिओ वाचवून मी सिनेकलावंतांना व कोल्हापुरकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो. महापालिकेने खरेदीदारांना पर्यायी जागा द्यावी किंवा स्टुडिओच्या हेरिटेज वास्तू संपादनाच्या बदल्यात उर्वरीत जागेत बांधकामाला परवानगी देऊन टीडीआर द्यावा असे दोन पर्याय शासनाने कोल्हापूर महापालिकेला दिले आहेत.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दाेन वर्षापूर्वी १२ फेब्रुवारी २०२२ रोजी जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षापूर्वीच विक्री झाल्याची बातमी 'लोकमत'ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काेल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कला-चित्रपट व्यावसायिकांनी आंदोलन पुकारले होते. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर एनडी स्टुडिओ शासनाने ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असतील तर भालजी पेंढारकर यांच्या स्मृती जपणारा जयप्रभा स्टुडिओही शासनाने घ्यावा अशी मागणी कोल्हापुरातील कलाप्रेमींनी केली होती. अखेर दीड वर्षाने राज्य शासनाने यावर महत्वाचे पाऊल उचलले असून ३ तारखेला नगरविकास विभागाने काेल्हापूर महापालिकेला याबाबत पत्र पाठवले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर