शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून श्रीपतराव शिंदेंना वाहिली अनोखी श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 20:29 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे जनतेच्या विविध प्रश्नावर विराट मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी त्यांचा जनसंघर्षाचा वसा कृतीतून जपला.

- राम मगदूम

खरीपाचा हंगाम वाया गेल्यामुळे गडहिंग्लज दुष्काळी तालुका जाहीर करा, सोयाबीनला प्रतिक्विंट १० हजार रूपये आणि गेल्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ४०० रूपये फरक मिळावा, अशी मागणी जनता दलातर्फे मोर्चाद्वारे करण्यात आली. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे जनतेच्या विविध प्रश्नावर विराट मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी त्यांचा जनसंघर्षाचा वसा कृतीतून जपला. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

लक्ष्मी चौकापासून सुरू झालेला मोर्चा प्रांतकचेरीवर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर प्रांताधिका-यांना निवेदन देण्यात आले. स्वाती कोरी म्हणाल्या, शिंदेंनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित, महिला, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या भल्यासाठी रस्त्यावरची लढाई केली. त्यांच्यामुळेच अरळगुंडी, हिटणी, हेब्बाळ, दुंडगे येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन झाले. गडहिंग्लज कारखाना व नगरपालिकेतील कामगारांना न्याय मिळाला.

बाबासाहेब नदाफ म्हणाले, केंद्र आणि राज्यातील सरकार भांडलवदार आणि धर्मवाद्यांचे राखणदार आहे. जाती-धर्माच्या नावावर सत्ता भोगण्याचा त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी शिंदेंच्या विचाराचीच गरज आहे. यावेळी तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, शंकर रणदिवे, बापूसाहेब म्हेत्री, शिवाजी होडगे, मधुकर मुसळे, शशीकांत मोहिते, शरद पडळकर, नीळकंठ कुराडे, शिवानंद घस्ती यांचीही भाषणे झाली. मोर्चात श्रीपती कदम, संभाजी नाईक, शिवाजी काकडे, हिंदूराव नौकुडकर, बसवराज खणगावे, नितीन देसाई, महेश कोरी, राजू खबाले, आनंदा सावंत, रामगोंडा पाटील, विश्वजीत सावंत, मालतेश पाटील, प्रियांका यादव आदींचा सहभाग होता.

कुटुंबियांचाही सहभागमोर्चात विजयराव शिंदे, रचना शिंदे, सुनिल शिंदे, अजित शिंदे, आप्पासाहेब पाटील, अनिता पाटील, स्मिता कोरी, मिलींद कोरी, प्रतीक कोरी, प्राची कोरी सहभागी झाले होते.

विचाराची कावड!नानांनी आयुष्यभर दीनदुबळ्यांसाठी संघर्ष केला. त्यांची काळजी, चिंता, वसा, विचार, जबाबदारी टाळणार नाही. त्यांच्या विचारांची कावड प्राणपणाने वाहिन. तुमच्या इच्छा, अपेक्षा, विश्वासाला कदापिही तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही स्वाती कोरी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.

मोर्चाच्या मागण्या२० पटाखालील शाळा बंद करू नका, कृषीउपसा यंत्रावर जलमापकाची सक्ती नको, संकेश्वर-बांदा महामार्ग बाधितांना योग्य भरपाई द्या, अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत सामावून घ्या, गडहिंग्लज कारखान्याच्या सेवेतील व सेवानिवृत्त कामगारांची थकित देणी-पगार द्या, शेंद्री एमआयडीसीत मोठा प्रकल्प सुरू करा, झोपडपट्टीतील बेघरांची घरे नियमित करा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर