शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरे आयुक्तांनीच चालवायची असतात, हे चुकीचे : शहरभान चळवळीचे मत; कोल्हापूरचा विकास नागरी नेतृत्वानेच करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक एक नवा विचार, नवा आदर्श निर्माण करणारी व्हावी. जगातील जी संपन्न शहरे आहेत, ...

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक एक नवा विचार, नवा आदर्श निर्माण करणारी व्हावी. जगातील जी संपन्न शहरे आहेत, ती कल्पकता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर नागरी नेतृत्वानेच घडविली आहेत. आपले शहर मात्र आयुक्तांच्या इच्छेनुसार, लहरीनुसार आकार घेत आहे. शहरे आयुक्तांनीच चालवायची असतात, ही धारणा घट्ट होत चालली आहे, ही चिंतेची बाब असून शहरविकासामध्ये याच शहरातील तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी सक्रिय व्हायला हवे, अशी अपेक्षा शहरभान चळवळीने मंगळवारी व्यक्त केली आहे. कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्रित येऊन ही चळवळ सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत चांगले उमेदवार निवडून यावेत, यासाठी ही चळवळ प्रयत्न करणार आहे.

त्यांच्यावतीने या निवडणुकीविषयी मांडलेली भूमिका अशी : लोकशाही समाजव्यवस्थेसाठी शहरांचे अस्तित्व खूप महत्त्वाचे आहे. ‘लोकशाही या संकल्पनेचा पाया शहरांनीच घातला आहे. शहरांमध्ये वेगवेगळ्या आचारविचारांचे, भिन्न जातींचे, भिन्न खाद्यसंस्कृतींचे लोक एकत्र नांदत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय एकमेकांच्या सहाय्यानेच भरभराटीला येत असतात. शहरी जीवन हे ‘परस्परावलंबी’ असल्याने सहिष्णुता, सहनशीलता, एकमेकांबाबत आदर हे गुण अंगी बाणवावे लागतात. समताधिष्ठित समाजनिर्मितीमधील शहरांचं बलस्थान सर्व समाजघटकांनी, विशेषत: राज्यकर्त्यानी समजून घेणे गरजेचे आहे.

मानवी इतिहासात २३ मे २००७ हा ऐतिहासिक दिवस मानला जातो. या दिवशी जगातील शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली. ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर, गावांचे शहरांमध्ये स्थित्यंतर, शहरांचे आर्थिक, भौतिक नियोजन या अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत. हा गुंता कौशल्याने आणि कल्पकतेने हाताळावा लागतो. यासाठी वाकबगार नागरी नेतृत्वाची शहरांना गरज आहे. ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या नागरी समाजाच्या संस्था आहेत. आपल्या राजकीय व्यवस्थेने या संस्था निर्माण केल्या; पण आपल्या संस्था आपणच चालवू शकेल, असा वाकबगार नागरी समाज निर्माण करण्यास राजकीय व्यवस्था अजूनही कमी पडली आहे.

धोरणे त्यांनी का ठरवायची?

ज्या शहराची ओळख ‘कलापूर’ अशी आहे, ज्या शहरात मोठ्या संखेने आर्किटेक्टस, इंजिनिअर्स, डॉक्टर्स, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, कलाकार, क्रीडातज्ज्ञ आहेत, अशा शहराची विकास धोरणे सरकारच्या अधिकाऱ्यांनी ठरविणे योग्य आहे का? कोल्हापूरमध्ये कशाचीही कमतरता नाही. आर्थिक, वैचारिक, नैसर्गिक संपन्नता असलेल्या कोल्हापूरची ‘कलापूर’ म्हणून असलेली ओळख दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे.

मनपा कुणी चालवावी...

नागरिकांच्या संस्था म्हणजेच पालिका, कोणी चालवाव्यात? गुंडानी? काळे धंदेवाल्यानी? की समाजवादी विचार जोपासणाऱ्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी? की आयुक्तांनी? याची प्रबोधनपर चर्चा या निवडणुकीच्या माध्यमातून घडावी ही अपेक्षा आहे.

गड राखला; पण कसला?

आपली माध्यमे अमक्याची सत्ता, तमक्याची सत्ता, गड राखला, गड जिंकला अशी चिथावणीखोर, फाजील ईर्षा वाढवणारी, तेढ वाढविणारी वार्तांकने करीत असतात. अनवधानाने समाजही त्यांच्या आहारी गेला आहे. निवडणुका या ‘सत्ताधीश’ निवडण्यासाठी नसतात, ‘प्रतिनिधी’ निवडण्यासाठी असतात, हे माध्यमांना समजून सांगणे गरजेचे वाटू लागले आहे.

सक्षम नेतृत्वाची आस

भारतीय संविधानाचे अधिष्ठान ‘समता’ आहे; पण वास्तवात आपली सगळी राजकीय व्यवस्था विषमतेचे पोषण करणारी झाली आहे. जातपातविरहीत ‘समताधिष्ठित समाज’ निर्माण करण्याची क्षमता शहरांमधेच आहे. पालिका सांभाळू शकेल अशा ध्येयवादी सक्षम नेतृत्वाची शहरांना आस आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता आणि नेतृत्वाचा दर्जा यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे.

विचारांची घुसळण अपेक्षित

होऊ घातलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत विधायक विचारांची घुसळण व्हावी. पालिका सभागृहाचा दर्जा उंचावला जावा. फाजील सत्ता-स्पर्धा, ईर्षा टाळली जावी. महापालिकेला दर्जेदार नेतृत्व मिळावे. आपण आपल्या क्षमतेचा वापर यासाठी करावा, असे या चळवळीला वाटते. अशा प्रयत्नांना सहकार्य देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असेही ‘माझं कोल्हापूर शहरभान चळवळी’ने म्हटले आहे.