शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नेत्यांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपविला, अरुण देसाईंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:20 IST

पक्षाचे काम थांबवून विकास आघाडी करणार, निष्ठावंतांकडे चंद्रकांत पाटील यांचे दुर्लक्ष

आजरा : चंदगड विधानसभेप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भाजपचे दोन - दोन उमेदवार देण्याचे काम झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीच संपविल्याचा घणाघाती आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अरुण देसाई यांनी केला. आजपासून भाजपचे काम थांबवून विकास आघाडी म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजरा येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.आजरा तालुक्यात भाजपचा विचार जिवंत ठेवण्याचे काम निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केले. चंद्रकांत पाटील मंत्री झाले; पण कार्यकर्त्यांसाठी काही उपयोग झाला नाही. पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या विकासकामाबाबत अपेक्षा होत्या; पण त्यांना न्याय देऊ शकलो नाही ही खंत असल्याचे प्रा. सुधीर मुंज यांनी सांगितले. भाजपला सुवर्णकाळ असतानाही बाहेरच्या लोकांना आत घेतले. त्यांनीच पक्ष हायजॅक केला. जिल्ह्याच्या नेत्यांनी निष्ठावंतांचा विश्वासघात करून अन्याय केला आहे. त्यामुळे भाजपतून आम्ही मुक्त झालो आहोत, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी सांगितले. भाजपच्या जोखडातून आम्ही मुक्त झालो आहे. यापुढे पक्षाचे कोणतेही बंधन आमच्यावर नाही. त्यामुळे आम्ही आमची ताकद दाखवून यापुढे सोयीचे राजकारण करणार असल्याचे साखर कारखाना संचालक मलिक बुरूड यांनी सांगितले. जिल्ह्यात भाजपच्या कामाऐवजी गटाची दुकानदारी सुरू झाली आहे. आम्ही भाजपचा जप करायचा व आमचे खच्चीकरण करून जिल्ह्याच्या नेत्यांनी उपऱ्यांना बळ दिले आहे, असा आरोप नाथा देसाई यांनी केला. पत्रकार परिषदेला महादेव टोपले, धनाजी पारपोलकर, दयानंद भुसारी, रमेश कारेकर आदी उपस्थित होते.

निष्ठावंतांकडे चंद्रकांत पाटील यांचे दुर्लक्षआजऱ्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळ नाही. मात्र, उपऱ्यांची कामे ते तातडीने करतात. पक्षात बाहेरच्यांना घ्या, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवू नका, असे अनेक वेळा बैठकांतून सांगितले. मात्र, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असाही आरोप अरुण देसाई यांनी केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील