शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नेत्यांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपविला, अरुण देसाईंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:20 IST

पक्षाचे काम थांबवून विकास आघाडी करणार, निष्ठावंतांकडे चंद्रकांत पाटील यांचे दुर्लक्ष

आजरा : चंदगड विधानसभेप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भाजपचे दोन - दोन उमेदवार देण्याचे काम झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीच संपविल्याचा घणाघाती आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अरुण देसाई यांनी केला. आजपासून भाजपचे काम थांबवून विकास आघाडी म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजरा येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.आजरा तालुक्यात भाजपचा विचार जिवंत ठेवण्याचे काम निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केले. चंद्रकांत पाटील मंत्री झाले; पण कार्यकर्त्यांसाठी काही उपयोग झाला नाही. पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या विकासकामाबाबत अपेक्षा होत्या; पण त्यांना न्याय देऊ शकलो नाही ही खंत असल्याचे प्रा. सुधीर मुंज यांनी सांगितले. भाजपला सुवर्णकाळ असतानाही बाहेरच्या लोकांना आत घेतले. त्यांनीच पक्ष हायजॅक केला. जिल्ह्याच्या नेत्यांनी निष्ठावंतांचा विश्वासघात करून अन्याय केला आहे. त्यामुळे भाजपतून आम्ही मुक्त झालो आहोत, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी सांगितले. भाजपच्या जोखडातून आम्ही मुक्त झालो आहे. यापुढे पक्षाचे कोणतेही बंधन आमच्यावर नाही. त्यामुळे आम्ही आमची ताकद दाखवून यापुढे सोयीचे राजकारण करणार असल्याचे साखर कारखाना संचालक मलिक बुरूड यांनी सांगितले. जिल्ह्यात भाजपच्या कामाऐवजी गटाची दुकानदारी सुरू झाली आहे. आम्ही भाजपचा जप करायचा व आमचे खच्चीकरण करून जिल्ह्याच्या नेत्यांनी उपऱ्यांना बळ दिले आहे, असा आरोप नाथा देसाई यांनी केला. पत्रकार परिषदेला महादेव टोपले, धनाजी पारपोलकर, दयानंद भुसारी, रमेश कारेकर आदी उपस्थित होते.

निष्ठावंतांकडे चंद्रकांत पाटील यांचे दुर्लक्षआजऱ्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळ नाही. मात्र, उपऱ्यांची कामे ते तातडीने करतात. पक्षात बाहेरच्यांना घ्या, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवू नका, असे अनेक वेळा बैठकांतून सांगितले. मात्र, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असाही आरोप अरुण देसाई यांनी केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील