शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

Shaktipeeth Highway: ढपल्यासाठी क्षीरसागर यांचा खटाटोप, राजू शेट्टी यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:04 IST

क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून ८६ लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली

कोल्हापूर : जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गास संमती दिल्याचा कांगावा केला होता. मात्र, मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केवळ ३५ शेतकऱ्यांनीच सातबारा दिले आहेत. यामुळे एक टक्का शेतकऱ्यांचेही शक्तिपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे समोर आले आहे. शासनाचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून ८६ लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली. तेच आता शक्तिपीठला बोगस शेतकरी दाखवून ५० हजार कोटींच्या ढपल्यात हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी सातबारा दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. यावर शेट्टी यांनी पत्रकाद्वारे टीका केली आहे.

वाचा - राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावापत्रकात म्हटले आहे, मुंबईतील बैठकीस माणगावातील सहा लोक घेऊन गेले होते. त्यातील तीन लोकांचीच जमीन संपादित केली जाणार आहे. उर्वरित तीन लोक भुजगावणे म्हणूनच घेऊन गेले होते. जिल्ह्यात एकूण ३ हजार ८२२ गट धारकांची जवळपास ५ हजार ३०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये १० हजार हून अधिक शेतकरी आहेत. यातील एक टक्काही शेतकऱ्यांनी महामार्गास संमती दिलेली नाही. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई देवी राक्षसाचा वध केली होती. याच शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणाऱ्या शक्तिपीठ महामार्गरूपी राक्षसापासून करवीर निवासिनी अंबाबाई रक्षण करेल. शक्तिपीठ महामार्गामुळे महापूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वन विभागातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची हानी होणार आहे. शहरात पूरस्थिती गंभीर होणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस संरक्षित भिंत झाल्यास गावाचे, शेतीचे, वस्त्यांचे विभाजन होणार आहे.

आमदार पाटील यांनी लेखी पत्र देऊनही..शेट्टी म्हणाले, आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अधिवेशनात शक्तिपीठ समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागितली होती. गत आठवड्यात याबाबत लेखी पत्र देऊनही त्या शेतकऱ्यांची यादी दिली नाही. जमिनीच्या मोबदल्यासंबंधी राज्य सरकार निर्णय स्पष्ट केलेले नाही. तरीही शक्तिपीठ रेटून करण्याचा प्रयत्न केला जात आहे.