शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

दिव्यांगांसाठीचा ५ टक्के खर्च करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : थातूर-मातूर कारणे देत दिव्यागांसाठीच्या योजनांना केराची टोपली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : थातूर-मातूर कारणे देत दिव्यागांसाठीच्या योजनांना केराची टोपली दाखविणाऱ्या ग्रामपंचायतींना आता चाप बसणार आहे. याबाबत येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने आता तीन पातळ्यांवर स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे. त्यामुळे आता दिव्यांसाठीचा निधी हडप करण्याच्या प्रकारांवर बंधने येणार आहेत.

राज्यातील अनेक ग्रामपंचायती त्यांच्या उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग कल्याणासाठीच्या योजनांवर खर्च करत नाहीत. ही रक्कम केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६नुसार खर्च करणे बंधनकारक आहे. दिनांक १७ एप्रिल २०१७ पासून हा कायदा देशभर लागू झाला. परंतु, अजूनही अनेक ग्रामपंचायती याची अंमलबजावणी करत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदांसमोर आंदोलने करून हा मुद्दा ऐरणीवर आणला.

या आंदोलनांची दखल घेत ग्रामविकास विभागाने गुरूवारी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे आता याबाबत केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

चौकट

ग्रामस्तरावर

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक तक्रार निवारण अधिकारी असतील. तसेच तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसात ते कार्यवाही करतील. यातून समाधान न झाल्यास संबंधितांकडून आदेश मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील अर्ज दाखल करता येईल.

चौकट

पंचायत समिती स्तरावर

तालुका स्तरावर गटविकास अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी असतील. त्यांनी त्यांच्याकडील अपिलावर ३० दिवसात आवश्यक कार्यवाही करणे बंधनकारक आहे. त्यातूनही संबंधिताचे समाधान न झाल्यास ३० दिवसात तो जिल्हा स्तरावरील समितीकडे अपील करू शकेल.

चौकट

जिल्हा स्तरावर

जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समिती असेल. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदस्य असतील तर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य सचिव असतील. जिल्हा स्तरावरील समितीची दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बैठक घेणे आणि ४५ दिवसात अहवाल देणे बंधनकारक राहणार आहे.