शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

दिव्यांगांसाठीचा ५ टक्के खर्च करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : थातूर-मातूर कारणे देत दिव्यागांसाठीच्या योजनांना केराची टोपली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : थातूर-मातूर कारणे देत दिव्यागांसाठीच्या योजनांना केराची टोपली दाखविणाऱ्या ग्रामपंचायतींना आता चाप बसणार आहे. याबाबत येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने आता तीन पातळ्यांवर स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे. त्यामुळे आता दिव्यांसाठीचा निधी हडप करण्याच्या प्रकारांवर बंधने येणार आहेत.

राज्यातील अनेक ग्रामपंचायती त्यांच्या उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग कल्याणासाठीच्या योजनांवर खर्च करत नाहीत. ही रक्कम केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६नुसार खर्च करणे बंधनकारक आहे. दिनांक १७ एप्रिल २०१७ पासून हा कायदा देशभर लागू झाला. परंतु, अजूनही अनेक ग्रामपंचायती याची अंमलबजावणी करत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदांसमोर आंदोलने करून हा मुद्दा ऐरणीवर आणला.

या आंदोलनांची दखल घेत ग्रामविकास विभागाने गुरूवारी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे आता याबाबत केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

चौकट

ग्रामस्तरावर

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक तक्रार निवारण अधिकारी असतील. तसेच तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसात ते कार्यवाही करतील. यातून समाधान न झाल्यास संबंधितांकडून आदेश मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील अर्ज दाखल करता येईल.

चौकट

पंचायत समिती स्तरावर

तालुका स्तरावर गटविकास अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी असतील. त्यांनी त्यांच्याकडील अपिलावर ३० दिवसात आवश्यक कार्यवाही करणे बंधनकारक आहे. त्यातूनही संबंधिताचे समाधान न झाल्यास ३० दिवसात तो जिल्हा स्तरावरील समितीकडे अपील करू शकेल.

चौकट

जिल्हा स्तरावर

जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समिती असेल. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदस्य असतील तर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य सचिव असतील. जिल्हा स्तरावरील समितीची दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बैठक घेणे आणि ४५ दिवसात अहवाल देणे बंधनकारक राहणार आहे.