शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

Kolhapur: करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला ३०९ वर्षे पूर्ण

By संदीप आडनाईक | Updated: September 28, 2024 15:53 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन ...

संदीप आडनाईककोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन शतकांपूर्वी झालेल्या परकीय आक्रमण काळात मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी तत्कालीन श्रीपूजकांपैकी एकाने ही मूर्ती एका घरात लपवून ठेवली होती. नंतर करवीर संस्थानाची स्थापना झाल्यानंतर या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे हा दिवस कोल्हापूरसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशातून लाखो भाविक येत असतात. या मंदिराला मोठा इतिहास आहे. मंदिरात गाभाऱ्यात विराजमान झालेल्या श्री अंबाबाईचा मूर्तीचा इतिहासही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली, अशी माहिती मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली.आदिलशाहीत मोगलांनी मंदिरांचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वर मंदिरामागे राहणाऱ्या तत्कालीन श्रीपूजकांनी ती स्वतःच्या घरी लपवून ठेवली, तशी नोंद करवीर माहात्म्यात आहे. १७१० मध्ये करवीर संस्थानाची स्थापना झाली. त्यानंतर संभाजी महाराज दुसरे यांच्या कारकिर्दीत १७१५ ते १७२२ या कालखंडात या मंदिराचे पुनरुज्जीवन झाले.वेदशास्त्रसंपन्न नरहर भट प्रधान (सावगावकर) यांनी पन्हाळगडावर जाऊन संभाजी महाराज छत्रपतींना अंबाबाईच्या मूर्तीविषयी आणि त्यांना मिळालेल्या दृष्टांताची माहिती दिली. त्यांनी सिदोजीराजे गजेंद्रगडकर घोरपडे यांना आज्ञा दिल्यानंतर मन्मथ नाम संवत्सर इंदूवासर (सोमवार) विजयादशमी (दसरा) म्हणजे २६ सप्टेंबर १७१५ या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना केली.

सध्या नित्यपूजेमधील श्री अंबाबाई मूर्तीचे वर्णन सर जोशीराव यांच्या गारेचा गणपती मंदिरातील खांबावरील १२ व्या शतकातील शिलालेखात आहे. मूर्तीच्या हातात म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र असून, मूर्ती अडीच फुटांची आहे. मस्तकावर संयोनी लिंग आहे. कोल्हापूरच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. -उमाकांत राणिंगा, मूर्ती अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर