शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

शिवरायांना अभिप्रेत सर्वसमाजाचा विकास आता अपेक्षित :शाहू छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:15 IST

काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले. याच कार्यक्रमात शिवाजी चौक सुशोभिकरणाचे काम येत्या पाच महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असे सांगून पुढील टप्प्यात येथे आनंदोत्सव केंद्र उभारले जाईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणाच्या भूमीपूजन पायाभरणी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. प्रमुख उपस्थिती आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक ईश्वर परमार, निलोफर आजरेकर, उमा बनछोडे यांची होती.

आ.क्षीरसागर यांच्या पुढाकाराने सुशोभिकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान सकाळी नऊ वाजता बिंदू चौक येथून जिल्ह्यातील ३३ गडकिल्लयांवरील पाणी, दगड, माती व तालीम संस्थांमधील माती तसेच जिल्ह्यातील १६ नद्यांमधील पाण्यांच्या कलशांची लेझीम, ढोलताशा, धनगरी ढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सेवक दांपत्याच्या हस्ते भूमिपूजन, शिवप्रतिष्ठानतर्फे शिवप्रेरणा मंत्र, मान्यवर महिलांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला.

शाहू छत्रपती म्हणाले, शिव-शाहूंचे विचार हे लोक हिताचे असल्याने ते चिरंतन असून संपूर्ण देश हे विचार पुढे नेत आहे. निव्वळ जय भवानी...जय शिवाजी...च्या घोषणा देऊन चालणार नाही तर समाजोपयोगी काम प्रत्येकाने हाती घेण्याची गरज आहे. आ. क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पुतळा सुशोभिकरणाचे ऐतिहासिक काम होत आहे.

आ. क्षीरसागर म्हणाले, शिवाजी चौक पुतळा सुशोभिकरणाचे काम सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन केले जात आहे. हे काम पाच महिन्यात पूर्ण करणाचा प्रयत्न आहे. हा पुतळा देशातील क्रमांक एकचा होईल. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे सुपुर्द करण्यात आलेला आहे. 

ते पुढे म्हणाले, पुढील टप्प्यात शिवाजी चौक परिसरात शिवरायांच्या काळातील विविध शिल्पे बसवून एक आनंदोत्सव केंद्र (सेलिब्रेशन सेंटर) उभारण्यात येणार आहे.

महापौर फरास यांनी पुतळा सुशोभिकरणाच्या कामासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल क्षीरसागर यांना धन्यवाद दिले.

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी उपमहापौर उदय पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.

शपथ आहे तुम्हाला...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पवित्रता जपण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. त्यामुळे कोणीही दारु पिऊन अथवा गुटखा, मावा खाऊन या पुतळ्याच्या कठड्याला स्पर्श करु नये, अशी शपथ आ. क्षीरसागर यांनी घातली.  (छाया : दीपक जाधव)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर