शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिवरायांना अभिप्रेत सर्वसमाजाचा विकास आता अपेक्षित :शाहू छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:15 IST

काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले. याच कार्यक्रमात शिवाजी चौक सुशोभिकरणाचे काम येत्या पाच महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असे सांगून पुढील टप्प्यात येथे आनंदोत्सव केंद्र उभारले जाईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणाच्या भूमीपूजन पायाभरणी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. प्रमुख उपस्थिती आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक ईश्वर परमार, निलोफर आजरेकर, उमा बनछोडे यांची होती.

आ.क्षीरसागर यांच्या पुढाकाराने सुशोभिकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान सकाळी नऊ वाजता बिंदू चौक येथून जिल्ह्यातील ३३ गडकिल्लयांवरील पाणी, दगड, माती व तालीम संस्थांमधील माती तसेच जिल्ह्यातील १६ नद्यांमधील पाण्यांच्या कलशांची लेझीम, ढोलताशा, धनगरी ढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सेवक दांपत्याच्या हस्ते भूमिपूजन, शिवप्रतिष्ठानतर्फे शिवप्रेरणा मंत्र, मान्यवर महिलांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला.

शाहू छत्रपती म्हणाले, शिव-शाहूंचे विचार हे लोक हिताचे असल्याने ते चिरंतन असून संपूर्ण देश हे विचार पुढे नेत आहे. निव्वळ जय भवानी...जय शिवाजी...च्या घोषणा देऊन चालणार नाही तर समाजोपयोगी काम प्रत्येकाने हाती घेण्याची गरज आहे. आ. क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पुतळा सुशोभिकरणाचे ऐतिहासिक काम होत आहे.

आ. क्षीरसागर म्हणाले, शिवाजी चौक पुतळा सुशोभिकरणाचे काम सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन केले जात आहे. हे काम पाच महिन्यात पूर्ण करणाचा प्रयत्न आहे. हा पुतळा देशातील क्रमांक एकचा होईल. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे सुपुर्द करण्यात आलेला आहे. 

ते पुढे म्हणाले, पुढील टप्प्यात शिवाजी चौक परिसरात शिवरायांच्या काळातील विविध शिल्पे बसवून एक आनंदोत्सव केंद्र (सेलिब्रेशन सेंटर) उभारण्यात येणार आहे.

महापौर फरास यांनी पुतळा सुशोभिकरणाच्या कामासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल क्षीरसागर यांना धन्यवाद दिले.

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी उपमहापौर उदय पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.

शपथ आहे तुम्हाला...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पवित्रता जपण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. त्यामुळे कोणीही दारु पिऊन अथवा गुटखा, मावा खाऊन या पुतळ्याच्या कठड्याला स्पर्श करु नये, अशी शपथ आ. क्षीरसागर यांनी घातली.  (छाया : दीपक जाधव)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर