शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

TET Exam : भावी गुरुजींना इंग्रजीने फोडला घाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:58 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : तीन वेळा लांबणीवर पडलेली डीएड, बीएड पात्रताधारकांसाठीची शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) रविवारी (दि. २१) झाली. ...

संतोष मिठारीकोल्हापूर : तीन वेळा लांबणीवर पडलेली डीएड, बीएड पात्रताधारकांसाठीची शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) रविवारी (दि. २१) झाली. ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपरमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांनी घाम फोडला. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ लागला. समाजशास्त्रातील प्रश्न किचकट असल्याचे परीक्षार्थींनी सांगितले.कोल्हापूर शहरातील विविध ३३ केंद्रावर राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा देण्यासाठी १७६०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५१९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २४१३ जण गैरहजर राहिले. या परीक्षेसाठी प्रत्येकी दीडशे गुणांचे दोन पेपर होते. त्यात भाषा, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवरील प्रश्न होते. त्यातील इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, सामाजिकशास्त्रे, इतिहास या विषयावरील प्रश्न कठीण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरातील परीक्षार्थींनी व्यक्त केली.जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे : ३३विद्यार्थी               पहिला पेपर        दुसरा पेपर

नोंदणी केलेले         ८७३१                 ८७३उपस्थित               ७३८५                ७८०६

अनुपस्थित            १३४६                १०६७

लॉजिकल रिझनिंगही अवघडइंग्रजीतील परिच्छेदावरील प्रश्न होते; मात्र त्याची उत्तरे त्यात नव्हती. त्याबाबतचे लॉजिकल रिझनिंग अवघड होते. सामाजिकशास्त्रात किचकट प्रश्न होते. बालमानसशास्त्रातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. त्यातील प्रश्न फिरवून विचारले होते, असे परीक्षार्थी योगिता पाटील यांनी सांगितले.एसटीच्या संपाचा फटकाएसटीचा संप असल्याने इचलकरंजी, चंदगड, राधानगरी, गडहिंग्लज, पन्हाळा, गारगोटी आदी ठिकाणांहून मिळेल त्या वाहनाने परीक्षार्थी आले. त्यात काहींना परीक्षा केंद्रावर येण्यास दोन ते दहा मिनिटांचा वेळ लागला. निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रात आले नसलेल्या सुमारे शंभर परीक्षार्थींना परीक्षेला मुकावे लागले.आता तयारी अभियोग्यता परीक्षेचीशिक्षक पात्रतेसाठी टीईटी परीक्षा झाली. त्यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आता फेब्रुवारीमध्ये अभियोग्यता परीक्षा होणार आहे. त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. शिक्षक म्हणून भरती होण्यासाठी अभियोग्यता परीक्षा महत्त्वाची आहे.परीक्षार्थी म्हणतात

इंग्रजी, बालमानसशास्त्रावरील प्रश्न कठीण होते. गणिताच्या काही प्रश्नांमध्ये मागील प्रश्नपात्रिकांमधील प्रश्नांशी साधर्म्य होते. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ लागला. -गीता माळी, मुडशिंगी.

पहिला पेपर बरा गेला. इतिहास, सामाजिकशास्त्रे या विषयांवरील प्रश्न किचकट स्वरूपाचे होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमांवरील प्रश्न अपेक्षित होते; मात्र त्याबाहेरील प्रश्न होते. -पूजा एकोंडे, रूकडी

इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. पूर्वी इंग्रजीतील परिच्छेदावरील प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये होती. यावेळचे पेपर तसे नव्हते. उत्तरे लिहिताना अधिक विचार करायला लागला. -विशाखा पाटील, गडमुडशिंगी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाTeacherशिक्षक