शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

धैर्यशील माने ही भाजपची चॉईस नाही का? राजू शेट्टींची विचारणा; अडचणीत असल्यानेच स्वाभिमानी, रासपची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:42 IST

आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेऊन दोन्ही निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नावे आठवण झाली

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी उमेदवार असताना भाजप नेते उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मला महायुतीसोबत या म्हणत आहेत, याचाच अर्थ खासदार धैर्यशील माने हे आता निवडून येऊ शकत नाहीत, अशी भाजपची खात्री झाली आहे. म्हणूनच त्यांनी पर्यायी उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. खासदार माने ही भाजपची चॉईस नाही, असाही मंत्री पाटील यांच्या विधानाचा स्पष्ट अर्थ होत असल्याचा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. मंत्री पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात आमचा शेट्टी यांच्याशी संवाद आहे व ते आमच्यासोबत येतील, असा विश्वास व्यक्त केला होता.शेट्टी म्हणाले, राजू शेट्टी यांची किंवा त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आता अचानक भाजप नेते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आठवण व्हावी, ही तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अडचणीत असल्याची प्रत्यक्ष कबुलीच आहे. शिवसेनेतून गद्दारी केलेल्या लोकांचे काय होते हे महाराष्ट्राने पाहिले, अनुभवले आहे. खेड (जि. रत्नागिरी) येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात काय घडणार याचीच चुणूक दिसत आहे. त्याची चाहूल लागल्यानेच मंत्री पाटील किंवा भाजपला आता मित्रपक्षांची आठवण झाली आहे.. अन्यथा मागच्या चार वर्षात भाजपवाल्यांच्या तोंडात रासप, शेतकरी संघटना हे शब्दही महाराष्ट्राला ऐकायला मिळाले नाहीत. आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेऊन दोन्ही निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नावे आठवण झाली आहे. एका अर्थाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचेच हे लक्षण आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही एकला चलो रे... ही भूमिका घेऊनच मैदानात उतरू.. आमचं ठरलं आहे. त्यात बदल नाहीच. महायुतीही नको व महाविकास आघाडीही नको. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा, प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा असेल तरच मला निवडून द्या, अशीच भूमिका घेऊन लोकांकडे जायचे निश्चित केले आहे, असे माजी खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, भाजपची संगत सोडल्यावर भाजपने संघटना संपवण्याचा प्रयत्न केला. खोत यांच्यासारखे बांडगूळ आमच्याविरोधात उभे करून संघटना जातीयवादी असल्याचे आरोप केले. कार्यकर्त्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा दिला; परंतु तरीही आम्ही त्यांना पुरून उरलो.

किंमत चुकती केली..गेल्या लोकसभेच्या आधीच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला अंगावर घेतले. त्याची किंमत आम्ही चुकती केली व त्याचा आम्हाला किंचितही पश्चात्ताप नाही. कारण सत्तेचा मोह कधीच नव्हता. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्या वाट्याला जाण्याचा प्रश्नच येत नाही.. पैरा एकदाच होतो. त्यात फसवणूक झाली की शेतकरी स्वत:च बैलाची जुपी करतो.. तो कुणासाठी थांबत नाही..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीBJPभाजपाElectionनिवडणूक