गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

By Admin | Updated: August 25, 2015 23:57 IST2015-08-25T23:57:34+5:302015-08-25T23:57:34+5:30

शेअर बाजार : ‘वेट अँड वॉच’च्या सावध पवित्र्यात, गुंतवणूकदारांनी निराशा टाळावी

Investors' trends | गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

कोल्हापूर : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी १६२५ अंशांनी घसरल्यामुळे कोल्हापूर शहरातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. बाजारात आणखी घसरण होण्याच्या भीतीने इंट्रा डे व्यवहार करणाऱ्यांनी खरेदीला मंगळवारी थंडा प्रतिसाद दिला.
कोल्हापूर शहरात शेअर ब्रोकरेजमध्ये काम करणाऱ्या अँजेल ब्रोकिंग, जॉर्इंड्रे, कार्वे, निर्मल बंग, आनंद राठी, ओसवाल सिक्युरिटीज, ट्रेडनेट, आदींसह सुमारे पन्नास कंपन्यांचे सबब्रोकर्स आहेत. बहुतांश कंपन्या या मुंबईतील आहेत. राजारामपुरी, शाहूपुरी, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ या परिसरात सबब्रोकर्स आहेत. शेअर बाजारामध्ये इंट्रा डे व्यवहार करणाऱ्यांची संख्या जास्त असून, यामध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर, व्यापारी आणि नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे.
पण सोमवारी (दि. २४) झालेल्या तीन वर्षांतील सर्वांत मोठ्या गुंतवणुकीने इंट्रा डेमधील गुंतवणूकदार सावध झाले आहेत. गुंतवणूकदार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे चित्र दिवसभरात दिसून आले; पण शेअर बाजारातील ही घसरण सरसकट नसते. शेअर बाजारात नोंदणी झालेल्या एकूण शेअरमध्ये झालेली ही घसरण असते. ती कंपनीनिहाय कमी-जास्त असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी निराश होऊ नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


शेअर बाजारातील तीन वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण असली तरी गुंतवणूकदारांनी निराश होण्याचे कारण नाही. इंट्रा डे ट्रेडिंगऐवजी लाँग टर्ममधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. या गुंतवणुकीतून मिळालेला नफा करमुक्त असतो. शेअर बाजारात इंट्रा डे ट्रेडिंगऐवजी लाँग टर्म गुंतवणूक फायदेशीर ठरते. २००८ साली टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने प्रत्येकी ८५० किमतीचे शेअर्स बाजारात व्रिकीसाठी आणले होते. आजमितीस या शेअर्सची किंमत चौपट झाली आहे. याशिवाय कंपनीने दहा हजार रुपयांचा लाभांशही दिलेला आहे.
- मनीष झंवर - इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष

Web Title: Investors' trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.