शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेने विक्री केलेल्या कारखान्यांच्या संचालकांची चौकशी लावा : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 12:47 IST

SugerFactory Politics : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे असताना भाजपचे नेते ईडीची कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले त्या संचालकांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देराज्य बँकेने विक्री केलेल्या कारखान्यांच्या संचालकांची चौकशी लावा : मुश्रीफकारखान्यांची लिलाव प्रक्रिया पारदर्शकच 

कोल्हापूर : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे असताना भाजपचे नेते ईडीची कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले त्या संचालकांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.साखरेचे दर व द्यावी लागणारी ऊसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने साखर कारखाने कोट्यवधींच्या तोट्यात गेले. परिणाम राज्य बँकेचे कर्ज थकीत गेले आणि बँकही अडचणीत येऊ लागली. बँकेचा एनपीए वाढल्याने नाईलाजाने बँकांना साखर कारखाने विकण्याशिवाय पर्याय नसतो.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जे कारखाने विकले आहेत त्यांची किंमत करून प्रसिद्धी माध्यमातून निविदा काढून ज्यांची जास्त बोली आलेली आहे, त्यांनाच हे कारखाने विकले गेले आहेत. असे असताना केवळ राजकारण म्हणून यामध्ये घोटाळे आहेत. ईडीची चौकशी केली गेली. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विक्री झालेल्या म्हणजेच सर्व ५४ कारखान्यांची चौकशी लावणार असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी तत्काळ विनाविलंब चौकशी लावावी.

या सगळ्या व्यवहाराचे दूध का दूध, पानी का पानी यापूर्वीच झालेले आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झालेली आहे, माजी न्यायाधीशांनीदेखील चौकशी केलेली आहे. त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. ज्या कारखान्यांच्या संचालकांनी कारखाने तोट्यात घातले त्यांची वास्तविक चौकशी होणे गरजेचे असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखानेchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर