शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर : मोबाईलवरील इंटरनेट सेवा पूर्ववत, गुरुवारी राहिले होते बंद ; अफवांना बसला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:42 IST

कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात मोबाईल(भ्रमणध्वनी)वरील इंटरनेट बंद करण्यात आले होते . त्यामुळे सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या विविध स्वरूपातील अफवांना आळा बसला. रात्री बारा वाजेनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत सुरळीतपणे सुरू झाले.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने घातले होते निर्बंध रात्री बारा वाजेनंतर इंटरनेट पूर्ववत मोबाईलवरील इंटरनेट बंद झाले. टूजी आणि थ्रीजी इंटरनेट सेवा राहिली बंद

कोल्हापूर : कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात मोबाईल(भ्रमणध्वनी)वरील इंटरनेट बंद करण्यात आले होते . त्यामुळे सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या विविध स्वरूपातील अफवांना आळा बसला. रात्री बारा वाजेनंतर इंटरनेट सेवा  पूर्ववत सुरळीतपणे सुरू झाले.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून बुधवारी रात्री आठ ते  गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा प्रक्षेपण व वहन, आदींवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले होते. याबाबतचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी बुधवारी काढला होता.

मात्र, कोल्हापूरमधील स्थिती बऱ्यांपैकी पूर्वपदावर आल्याने गुरुवारी सकाळी ब्रॉडबँण्ड आणि मोबाईलवरील इंटरनेट सेवा सुरू राहिली; पण, भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) पुणे विभागाकडून कोल्हापूरमधील कार्यालयाला मोबाईलवरील इंटरनेट बंद करण्यात येत असल्याबाबतचा ई-मेल दुपारी २ वाजून ४८ मिनिटांनी प्राप्त झाला.

येथील कार्यालयाने याबाबतची खात्री दिल्यानंतर दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी मोबाईलवरील इंटरनेट बंद झाले. टूजी आणि थ्रीजी इंटरनेट सेवा बंद राहिली. त्यामुळे मोबाईलवरील हाताळण्यात येणारी व्हॉटस् अ‍ॅप, हाईक आदी सामाजिक माध्यमांचा वापर बंद राहिला. ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू असल्याने विविध शासकीय आणि खासगी कार्यालयांतील इंटरनेटशी निगडित असणारे कामकाज सुरळीतपणे सुरू होते.

 

कोल्हापूरमधील ‘बंद’ला हिंसक वळण लागल्याने समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफीती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करून अस्थिरता निर्माण केल्या जाऊ शकतात. ते टाळण्यासह सामाजिक शांतता कायम राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मोबाईलवरील इंटरनेट बंद करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार गुरुवारी मोबाईलवरील इंटरनेट सेवा बंद राहिली.- नंदकुमार काटकर,प्रभारी जिल्हाधिकारी

 

 

पुणे विभागाच्या सूचनेनुसार दुपारी तीननंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईलवरील इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली. त्यात टूजी आणि थ्रीजी सेवेचा समावेश होता. त्यातील केवळ डाटा बंद करण्यात आला होता. मात्र, ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू राहिली. गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत मोबाईलवरील इंटरनेट बंद करण्याची सूचना पुणे विभागाकडून आमच्या कोल्हापूर कार्यालयाला करण्यात आली आहे.- व्ही. जी. दरवाजकर,सहाय्यक सरव्यवस्थापक,बीएसएनएल कोल्हापूर. 

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावkolhapurकोल्हापूरBSNLबीएसएनएल