शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

आंतरराष्ट्रीय ख्यातनाम नेहरू यांची हॅट्ट्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:09 IST

- वसंत भोसले देशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू ...

- वसंत भोसलेदेशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाची १५ वर्षे होत आली होती. त्यांनी देशाच्या विकासासाठी ना भांडवलशाही ना समाजवादी अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्थेचा मध्यम मार्ग स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाचे दोन गट पडले होते. एका गटाचे नेतृत्व अमेरिका करीत होता, तर दुसऱ्या गटात रशियाच्या नेतृत्वाखाली अनेक कम्युनिस्ट देश एकवटले होते. अशा परिस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिसऱ्या जगाची मांडणी करून, त्यासाठी अलिप्ततावादी तत्त्वप्रणालीनुसार अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली होती.पहिल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांद्वारे एक देशव्यापी नेतृत्व आता आंतरराष्ट्रीय ख्यातनाम होत आले होते. मात्र, त्यांचा कल रशियाच्या बाजूने अधिक होता. त्यामुळे रशियाने स्वीकारलेल्या नियोजनबद्ध विकासाची कल्पना त्यांनी राबविण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना, पंचवार्षिक योजना, आदी मार्ग अवलंबले होते. त्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील मोठमोठे उद्योग उभे करण्याचा सपाटा लावला होता. अनेक धरणांची आखणी केली होती. ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले होते. एका नव्या राष्ट्र उभारणीच्या कामाने गती पकडली होती आणि उद्योगपतींपासून कामगारांपर्यंत शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपर्यंत सर्वांचे नेतृत्व स्वत:कडे खेचून आणण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यशस्वी झाले होते. त्याचवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही एक स्वत:ची ओळख निर्माण केली होती.अशा वातावरणात तिसºया लोकसभेसाठी देशात १९ फेब्रुवारी १९६२ पासून सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्तरी पार केली असली तरी त्यांचा करिष्मा कमी झालेला नव्हता आणि त्यांनी देशाच्या विकासाला दिलेला आकार समजातील सर्व स्तरातील मतदारांना पसंत पडला होता. त्यामुळे २१ कोटी ६३ लाख ६१ हजार ५५९ मतदारांपैकी ५५.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४४.७२ टक्के मते घेऊन काँग्रेसने ४९४ जागांपैकी ३६१ जागा जिंकल्या. देशाच्या इतिहासात यावेळी दुसºयांदा मतदारसंघाची रचना झाली होती. राखीव जागा स्वतंत्र दिल्या होत्या. ४९४ मतदारसंघांपैकी १०९ जागा (अनुसूचित जाती ७९ आणि जमातीसाठी ३०) राखीव ठेवण्यात आल्या होत्या.प्रथमच एका मतदारसंघातून एकच उमेदवार निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण देशभर राबविण्यात आली होती. अठरा राज्यांची आता निर्मिती झाली होती. १ नोव्हेंबर १९५६ला कर्नाटकची निर्मिती झाली होती. द्विभाषिक राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी या निवडणुका झाल्या. १९५७ चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोर ओसरला होता. मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती. बेळगावसह जो सीमाभाग कर्नाटकात राहिला, ती बोच कायम होती.महाराष्ट्रात यावेळी ४४ मतदारसंघ तयार झाले होते. त्यापैकी ४१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. नागपूरमध्ये महाधो श्रीहरी अणे आणि चांदामधून लाल श्यामलाल भगवानशहा हे अपक्ष म्हणून निवडून आले, तर कोकणातील राजापूरमध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै विजयी झाले होते. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते.