शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातनाम नेहरू यांची हॅट्ट्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:09 IST

- वसंत भोसले देशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू ...

- वसंत भोसलेदेशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाची १५ वर्षे होत आली होती. त्यांनी देशाच्या विकासासाठी ना भांडवलशाही ना समाजवादी अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्थेचा मध्यम मार्ग स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाचे दोन गट पडले होते. एका गटाचे नेतृत्व अमेरिका करीत होता, तर दुसऱ्या गटात रशियाच्या नेतृत्वाखाली अनेक कम्युनिस्ट देश एकवटले होते. अशा परिस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिसऱ्या जगाची मांडणी करून, त्यासाठी अलिप्ततावादी तत्त्वप्रणालीनुसार अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली होती.पहिल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांद्वारे एक देशव्यापी नेतृत्व आता आंतरराष्ट्रीय ख्यातनाम होत आले होते. मात्र, त्यांचा कल रशियाच्या बाजूने अधिक होता. त्यामुळे रशियाने स्वीकारलेल्या नियोजनबद्ध विकासाची कल्पना त्यांनी राबविण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना, पंचवार्षिक योजना, आदी मार्ग अवलंबले होते. त्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील मोठमोठे उद्योग उभे करण्याचा सपाटा लावला होता. अनेक धरणांची आखणी केली होती. ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले होते. एका नव्या राष्ट्र उभारणीच्या कामाने गती पकडली होती आणि उद्योगपतींपासून कामगारांपर्यंत शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपर्यंत सर्वांचे नेतृत्व स्वत:कडे खेचून आणण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यशस्वी झाले होते. त्याचवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही एक स्वत:ची ओळख निर्माण केली होती.अशा वातावरणात तिसºया लोकसभेसाठी देशात १९ फेब्रुवारी १९६२ पासून सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्तरी पार केली असली तरी त्यांचा करिष्मा कमी झालेला नव्हता आणि त्यांनी देशाच्या विकासाला दिलेला आकार समजातील सर्व स्तरातील मतदारांना पसंत पडला होता. त्यामुळे २१ कोटी ६३ लाख ६१ हजार ५५९ मतदारांपैकी ५५.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४४.७२ टक्के मते घेऊन काँग्रेसने ४९४ जागांपैकी ३६१ जागा जिंकल्या. देशाच्या इतिहासात यावेळी दुसºयांदा मतदारसंघाची रचना झाली होती. राखीव जागा स्वतंत्र दिल्या होत्या. ४९४ मतदारसंघांपैकी १०९ जागा (अनुसूचित जाती ७९ आणि जमातीसाठी ३०) राखीव ठेवण्यात आल्या होत्या.प्रथमच एका मतदारसंघातून एकच उमेदवार निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण देशभर राबविण्यात आली होती. अठरा राज्यांची आता निर्मिती झाली होती. १ नोव्हेंबर १९५६ला कर्नाटकची निर्मिती झाली होती. द्विभाषिक राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी या निवडणुका झाल्या. १९५७ चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोर ओसरला होता. मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती. बेळगावसह जो सीमाभाग कर्नाटकात राहिला, ती बोच कायम होती.महाराष्ट्रात यावेळी ४४ मतदारसंघ तयार झाले होते. त्यापैकी ४१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. नागपूरमध्ये महाधो श्रीहरी अणे आणि चांदामधून लाल श्यामलाल भगवानशहा हे अपक्ष म्हणून निवडून आले, तर कोकणातील राजापूरमध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै विजयी झाले होते. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते.