शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय ख्यातनाम नेहरू यांची हॅट्ट्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:09 IST

- वसंत भोसले देशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू ...

- वसंत भोसलेदेशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाची १५ वर्षे होत आली होती. त्यांनी देशाच्या विकासासाठी ना भांडवलशाही ना समाजवादी अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्थेचा मध्यम मार्ग स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाचे दोन गट पडले होते. एका गटाचे नेतृत्व अमेरिका करीत होता, तर दुसऱ्या गटात रशियाच्या नेतृत्वाखाली अनेक कम्युनिस्ट देश एकवटले होते. अशा परिस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिसऱ्या जगाची मांडणी करून, त्यासाठी अलिप्ततावादी तत्त्वप्रणालीनुसार अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली होती.पहिल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांद्वारे एक देशव्यापी नेतृत्व आता आंतरराष्ट्रीय ख्यातनाम होत आले होते. मात्र, त्यांचा कल रशियाच्या बाजूने अधिक होता. त्यामुळे रशियाने स्वीकारलेल्या नियोजनबद्ध विकासाची कल्पना त्यांनी राबविण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना, पंचवार्षिक योजना, आदी मार्ग अवलंबले होते. त्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील मोठमोठे उद्योग उभे करण्याचा सपाटा लावला होता. अनेक धरणांची आखणी केली होती. ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले होते. एका नव्या राष्ट्र उभारणीच्या कामाने गती पकडली होती आणि उद्योगपतींपासून कामगारांपर्यंत शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपर्यंत सर्वांचे नेतृत्व स्वत:कडे खेचून आणण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यशस्वी झाले होते. त्याचवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही एक स्वत:ची ओळख निर्माण केली होती.अशा वातावरणात तिसºया लोकसभेसाठी देशात १९ फेब्रुवारी १९६२ पासून सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्तरी पार केली असली तरी त्यांचा करिष्मा कमी झालेला नव्हता आणि त्यांनी देशाच्या विकासाला दिलेला आकार समजातील सर्व स्तरातील मतदारांना पसंत पडला होता. त्यामुळे २१ कोटी ६३ लाख ६१ हजार ५५९ मतदारांपैकी ५५.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४४.७२ टक्के मते घेऊन काँग्रेसने ४९४ जागांपैकी ३६१ जागा जिंकल्या. देशाच्या इतिहासात यावेळी दुसºयांदा मतदारसंघाची रचना झाली होती. राखीव जागा स्वतंत्र दिल्या होत्या. ४९४ मतदारसंघांपैकी १०९ जागा (अनुसूचित जाती ७९ आणि जमातीसाठी ३०) राखीव ठेवण्यात आल्या होत्या.प्रथमच एका मतदारसंघातून एकच उमेदवार निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण देशभर राबविण्यात आली होती. अठरा राज्यांची आता निर्मिती झाली होती. १ नोव्हेंबर १९५६ला कर्नाटकची निर्मिती झाली होती. द्विभाषिक राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी या निवडणुका झाल्या. १९५७ चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोर ओसरला होता. मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती. बेळगावसह जो सीमाभाग कर्नाटकात राहिला, ती बोच कायम होती.महाराष्ट्रात यावेळी ४४ मतदारसंघ तयार झाले होते. त्यापैकी ४१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. नागपूरमध्ये महाधो श्रीहरी अणे आणि चांदामधून लाल श्यामलाल भगवानशहा हे अपक्ष म्हणून निवडून आले, तर कोकणातील राजापूरमध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै विजयी झाले होते. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते.