शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

आंतरराष्ट्रीय ख्यातनाम नेहरू यांची हॅट्ट्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:09 IST

- वसंत भोसले देशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू ...

- वसंत भोसलेदेशाची फाळणी, राज्यघटना, पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना आदी दिव्यातून भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाची १५ वर्षे होत आली होती. त्यांनी देशाच्या विकासासाठी ना भांडवलशाही ना समाजवादी अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्थेचा मध्यम मार्ग स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाचे दोन गट पडले होते. एका गटाचे नेतृत्व अमेरिका करीत होता, तर दुसऱ्या गटात रशियाच्या नेतृत्वाखाली अनेक कम्युनिस्ट देश एकवटले होते. अशा परिस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिसऱ्या जगाची मांडणी करून, त्यासाठी अलिप्ततावादी तत्त्वप्रणालीनुसार अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली होती.पहिल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांद्वारे एक देशव्यापी नेतृत्व आता आंतरराष्ट्रीय ख्यातनाम होत आले होते. मात्र, त्यांचा कल रशियाच्या बाजूने अधिक होता. त्यामुळे रशियाने स्वीकारलेल्या नियोजनबद्ध विकासाची कल्पना त्यांनी राबविण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना, पंचवार्षिक योजना, आदी मार्ग अवलंबले होते. त्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील मोठमोठे उद्योग उभे करण्याचा सपाटा लावला होता. अनेक धरणांची आखणी केली होती. ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले होते. एका नव्या राष्ट्र उभारणीच्या कामाने गती पकडली होती आणि उद्योगपतींपासून कामगारांपर्यंत शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपर्यंत सर्वांचे नेतृत्व स्वत:कडे खेचून आणण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यशस्वी झाले होते. त्याचवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही एक स्वत:ची ओळख निर्माण केली होती.अशा वातावरणात तिसºया लोकसभेसाठी देशात १९ फेब्रुवारी १९६२ पासून सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्तरी पार केली असली तरी त्यांचा करिष्मा कमी झालेला नव्हता आणि त्यांनी देशाच्या विकासाला दिलेला आकार समजातील सर्व स्तरातील मतदारांना पसंत पडला होता. त्यामुळे २१ कोटी ६३ लाख ६१ हजार ५५९ मतदारांपैकी ५५.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४४.७२ टक्के मते घेऊन काँग्रेसने ४९४ जागांपैकी ३६१ जागा जिंकल्या. देशाच्या इतिहासात यावेळी दुसºयांदा मतदारसंघाची रचना झाली होती. राखीव जागा स्वतंत्र दिल्या होत्या. ४९४ मतदारसंघांपैकी १०९ जागा (अनुसूचित जाती ७९ आणि जमातीसाठी ३०) राखीव ठेवण्यात आल्या होत्या.प्रथमच एका मतदारसंघातून एकच उमेदवार निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण देशभर राबविण्यात आली होती. अठरा राज्यांची आता निर्मिती झाली होती. १ नोव्हेंबर १९५६ला कर्नाटकची निर्मिती झाली होती. द्विभाषिक राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी या निवडणुका झाल्या. १९५७ चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोर ओसरला होता. मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती. बेळगावसह जो सीमाभाग कर्नाटकात राहिला, ती बोच कायम होती.महाराष्ट्रात यावेळी ४४ मतदारसंघ तयार झाले होते. त्यापैकी ४१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. नागपूरमध्ये महाधो श्रीहरी अणे आणि चांदामधून लाल श्यामलाल भगवानशहा हे अपक्ष म्हणून निवडून आले, तर कोकणातील राजापूरमध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै विजयी झाले होते. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते.