शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:38 IST

महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व्यावसाईकांच्या सर्व तऱ्हेच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नयेत. असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना व व्यापाऱ्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

ठळक मुद्देपूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या सर्व कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी घेऊ नये जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : शिवसेनेसह व्यापारी, व्यावसाईकांनी दिले निवेदन

कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसाईक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरील व्यावसाईकांची संख्या मोठी आहे. कर्ज काढून सुुरु केलेला व्यवसायच पाण्यात गेल्याने हप्ते फेडणे व व्याज भरणे शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व्यावसाईकांच्या सर्व तऱ्हेच्या कर्जावरील व्याज ५ आॅगस्टपासून सहा महिन्यांसाठी बॅँकांनी घेऊ नयेत. असे आदेश त्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना व व्यापाऱ्यांच्या व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली. या पुरामुळे व्यापारी, व्यावसाईक पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्यांना उभे राहण्यासाठी शासनपातळीवर मदत होणे गरजेची आहे, असे पवार यांनी सांगितले.निवेदनातील प्रमुख मागण्या अशा, सहा महिन्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करुन ती स्वतंत्र लिहून ठेवावी, परंतु व्याजावर व्याज, दंडव्याज आकारले जाऊ नये, मुदती कर्जात कर्जदारांना विनंतीनुसार कर्जमुक्त, कर्जहप्ता यांची फेररचना करुन घ्यावी, राष्ट्रीय, राज्य आपदा राहत कोष, शासन आदीकडून मिळणारी अंतिम मदत किंवा विमा परतावा जो कर्ज खात्यास परस्पर जमा होईल तो बॅँकेने कर्जास जमा करुन घेऊ नये, बॅँकांनी पूरग्रस्त कर्जदारांच्या बाबतीत कर्ज कॅश क्रेडीट स्वरुपाचे असल्यास ५ आॅगस्ट २०१९ रोजी कर्जमर्यादा होती तीच किमान पुढील १२ महिने विना बदल वापरण्याची जागा मिळावी.

कर्जदाराने बॅँकेस तारण दिलेल्या मालाची स्थावर, जंगम मालमत्तेची मासिक बाजारभावाने होणारी किंमत यावर त्याची उचलीची मर्यादा ठरते, पुरामुळे तारण नाहीसे झाले असेल किंवा त्याचे बाजारमुल्य घटले असेल, त्यामुळे कर्जदाराची किमान मंजूर मर्यादा वापरण्याची परवानगी त्याला मिळावी.यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दिलीप शेटे,अमर समर्थ, संजय शेटे, गिरिष साटम, शशिकांत बिडकर, शैलेश पुणेकर, कमलाकर जगदाळे, रणजीत आयरेकर, हर्षल सुर्वे, मनजित माने, कपिल डोईफोडे, शिवाजी पाटील, प्रवीण पालव, राजू जाधव, अभिजीत बुकशेठ आदी उपस्थित होते.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शशिकांत बिडकर, सुजित चव्हाण, दिलीप शेटे, शिवाजी पाटील, अमर समर्थ, संजय शेटे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरShiv Senaशिवसेना