शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

अपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:21 PM

परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

ठळक मुद्देअपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारणसाडेचार हजार पास प्रलंबित : प्रतिदिन तीन हजार पासची नोंदणी

कोल्हापूर : परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

कोल्हापूरच्याजिल्हाधिकारी कार्यालयातून फक्त बाहेरगावी जाण्यासाठी पास दिले जातात. पुणे किंवा अन्य कोणत्याही शहरातून कोल्हापुरात यायचे असेल तर ते पास संबंधित जिल्ह्याकडून दिले जातात; परंतु तरीही लोक येथे येऊन तक्रारी करतात.मेपासून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून महसूलचे १० हून अधिक कर्मचारी केवळ ई-पास देत आहेत. मंजूर पासच्या तुलनेत पास नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. त्याबाबत सोमवारी (दि. १०) रात्री ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनीही सोशल मीडियावर तक्रार केली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गवस यांच्या जावयाचा पास तातडीने मंजूर करून दिला.कोल्हापुरातून बाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून हे ई-पास मंजूर केले जातात. शिवाय ते केवळ एका दिवसासाठीचेच असतात. म्हणजे व्यक्ती बाहेरगावी गेली की पुढील २४ तासांतच त्यांनी परत कोल्हापुरात येणे अपेक्षित असते. मात्र अनेकजण तीन-चार दिवसांच्या मुदतीचे अर्ज करतात, काहीजणांनी आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केलेली नसते.

अनेकजण योग्य कारण देत नाहीत. त्यांचे कारण आणि मंजुरीच्या तारखेत ताळमेळ नसतो. खूप वेळा तर अर्ज मंजूर झालेला असतो; पण त्यांनी लिंकवर जाऊन ते बघितलेलेच नसते. बऱ्याचदा काहीतरी कारण द्यायचे आणि तुम्ही पास मंजूरच का करत नाही म्हणून भांडत यायचे अशा प्रकारांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते.नाकारण्याची कारणे

  • इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात येण्याचा अर्ज
  • परतीचा कालावधी २४ तासांहून अधिक
  • आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र न जोडणे
  • कारण नीट न लिहिणे, अथवा अपुरी व चुकीची माहिती

सध्या विभागाकडे गेल्या दोन दिवसांचेच अर्ज प्रलंबित आहेत. तातडीचे आणि अत्यावश्यक कारण असेल तर नागरिकांनी परगावी जावे. त्यासाठीचे अर्जही व्यवस्थित व प्रशासनाच्या नियमानुसार भरावेत.-रंजना बिचकरई-पास मंजूर कक्ष अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर