शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

येणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:29 IST

येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देयेणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरूढपला मारलेल्यांची धावपळ : योजना होऊनही पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पाणीटंचाई कायस्वरूपी निकालात निघण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून पेयजल योजनेतून दोन योजना राबविल्या. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणातून पाणी उपसण्यासाठी जॅकवेल बांधण्यात आले; मात्र जॅकवेलपर्यंत ऐन उन्हाळ्यात पाणी पोहोचत नाही. पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे पाणी पिण्यास योग्य नाही. जॅकवेलजवळील पाणी कमी झाल्यानंतर दोन महिने पाणीटंचाई निर्माण होते. अशा अनेक प्रकारच्या त्रुटी योजनेत आहेत.

वारंवार अंतर्गत पाईपलाईन फुटते. यामुळे ग्रामस्थांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. योजनेत काही गाव पुढाऱ्यांनी मोठा ढपला मारला आहे, कामात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी कुराडे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ठळकपणे रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर योजनेतील गैरकामकाजाचे बिंग फुटले. प्रशासकीय पातळीवरही धावाधाव सुरू झाली आहे. गावाबाहेर राहून सूत्रे हलविणारे पुढारी ढपला चव्हाट्यावर येऊ नये; यासाठी दबावतंत्राचा अवलंब करत आहेत; मात्र कुराडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, ठोस पाठपुराव्याचा रेटा लावल्याने त्यांची अडचण झाल्याचे चित्र आहे.कामात पैसे मुरवल्याची चर्चायोजनेत डल्ला मारून काही कारभारी मालामाल झाल्याची चर्चा गावात अनेक दिवसांपासून आहे; पण एकमेकांचे नातेवाईक, पै-पाहुणे, संधी साधू राजकीय हितसंबंधामुळे तक्रार करण्यास कोणी पुढाकार घेतले नव्हते. स्वच्छ पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय, हाल पाहून कुराडे यांनी तक्रार करण्याचे धाडस केले.

इस्टिमेट वाढविण्यासाठी पुढाऱ्यांनी जॅकवेलची जागा चुकीची निवडली. पाईपही निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. ते वारंवार फुटतात. पाईपलाईन टाकतानाही पुढाºयांनी आपल्या शेताजवळून कशी जाईल, यावर विशेष लक्ष दिले. यामुळे पाणी योजनेची वाट लागली. यातील दोषींना कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे.अंकुश कुराडे, तक्रारदार 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर