शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

येणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:29 IST

येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देयेणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरूढपला मारलेल्यांची धावपळ : योजना होऊनही पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पाणीटंचाई कायस्वरूपी निकालात निघण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून पेयजल योजनेतून दोन योजना राबविल्या. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणातून पाणी उपसण्यासाठी जॅकवेल बांधण्यात आले; मात्र जॅकवेलपर्यंत ऐन उन्हाळ्यात पाणी पोहोचत नाही. पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे पाणी पिण्यास योग्य नाही. जॅकवेलजवळील पाणी कमी झाल्यानंतर दोन महिने पाणीटंचाई निर्माण होते. अशा अनेक प्रकारच्या त्रुटी योजनेत आहेत.

वारंवार अंतर्गत पाईपलाईन फुटते. यामुळे ग्रामस्थांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. योजनेत काही गाव पुढाऱ्यांनी मोठा ढपला मारला आहे, कामात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी कुराडे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ठळकपणे रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर योजनेतील गैरकामकाजाचे बिंग फुटले. प्रशासकीय पातळीवरही धावाधाव सुरू झाली आहे. गावाबाहेर राहून सूत्रे हलविणारे पुढारी ढपला चव्हाट्यावर येऊ नये; यासाठी दबावतंत्राचा अवलंब करत आहेत; मात्र कुराडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, ठोस पाठपुराव्याचा रेटा लावल्याने त्यांची अडचण झाल्याचे चित्र आहे.कामात पैसे मुरवल्याची चर्चायोजनेत डल्ला मारून काही कारभारी मालामाल झाल्याची चर्चा गावात अनेक दिवसांपासून आहे; पण एकमेकांचे नातेवाईक, पै-पाहुणे, संधी साधू राजकीय हितसंबंधामुळे तक्रार करण्यास कोणी पुढाकार घेतले नव्हते. स्वच्छ पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय, हाल पाहून कुराडे यांनी तक्रार करण्याचे धाडस केले.

इस्टिमेट वाढविण्यासाठी पुढाऱ्यांनी जॅकवेलची जागा चुकीची निवडली. पाईपही निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. ते वारंवार फुटतात. पाईपलाईन टाकतानाही पुढाºयांनी आपल्या शेताजवळून कशी जाईल, यावर विशेष लक्ष दिले. यामुळे पाणी योजनेची वाट लागली. यातील दोषींना कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे.अंकुश कुराडे, तक्रारदार 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर