शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

येणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:29 IST

येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देयेणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरूढपला मारलेल्यांची धावपळ : योजना होऊनही पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पाणीटंचाई कायस्वरूपी निकालात निघण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून पेयजल योजनेतून दोन योजना राबविल्या. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणातून पाणी उपसण्यासाठी जॅकवेल बांधण्यात आले; मात्र जॅकवेलपर्यंत ऐन उन्हाळ्यात पाणी पोहोचत नाही. पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे पाणी पिण्यास योग्य नाही. जॅकवेलजवळील पाणी कमी झाल्यानंतर दोन महिने पाणीटंचाई निर्माण होते. अशा अनेक प्रकारच्या त्रुटी योजनेत आहेत.

वारंवार अंतर्गत पाईपलाईन फुटते. यामुळे ग्रामस्थांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. योजनेत काही गाव पुढाऱ्यांनी मोठा ढपला मारला आहे, कामात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी कुराडे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ठळकपणे रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर योजनेतील गैरकामकाजाचे बिंग फुटले. प्रशासकीय पातळीवरही धावाधाव सुरू झाली आहे. गावाबाहेर राहून सूत्रे हलविणारे पुढारी ढपला चव्हाट्यावर येऊ नये; यासाठी दबावतंत्राचा अवलंब करत आहेत; मात्र कुराडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, ठोस पाठपुराव्याचा रेटा लावल्याने त्यांची अडचण झाल्याचे चित्र आहे.कामात पैसे मुरवल्याची चर्चायोजनेत डल्ला मारून काही कारभारी मालामाल झाल्याची चर्चा गावात अनेक दिवसांपासून आहे; पण एकमेकांचे नातेवाईक, पै-पाहुणे, संधी साधू राजकीय हितसंबंधामुळे तक्रार करण्यास कोणी पुढाकार घेतले नव्हते. स्वच्छ पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय, हाल पाहून कुराडे यांनी तक्रार करण्याचे धाडस केले.

इस्टिमेट वाढविण्यासाठी पुढाऱ्यांनी जॅकवेलची जागा चुकीची निवडली. पाईपही निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. ते वारंवार फुटतात. पाईपलाईन टाकतानाही पुढाºयांनी आपल्या शेताजवळून कशी जाईल, यावर विशेष लक्ष दिले. यामुळे पाणी योजनेची वाट लागली. यातील दोषींना कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे.अंकुश कुराडे, तक्रारदार 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर