शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘मन की बात’द्वारे भाजपने दिली मोदींच्या कार्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:12 IST

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा ‘ मन की बात’ कार्यक्रम रविवारी झाला. भाजपतर्फे शहरातील ...

ठळक मुद्दे‘मन की बात’द्वारे भाजपने दिली मोदींच्या कार्याची माहिती शहरातील सात ठिकाणी झाला कार्यक्रम

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा ‘मन की बात’ कार्यक्रम रविवारी झाला. भाजपतर्फे शहरातील सात मंडलांमध्ये हा कार्यक्रम घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या कार्यासह ते राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. ११ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हे अभियान प्रत्येक प्रभागांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावे, असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यावेळी केले.प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम होत असतो. त्यानुसार भाजपतर्फे शहरातील शिवाजी पेठ येथे नेसरीकर वाडा, मंगळवार पेठ येथे सणगर गल्ली तालीम, उत्तरेश्वर पेठ येथे रेगे तिकटी, शाहूपुरी येथे शाहूपुरी तालीम, राजारामपुरी मंडलमध्ये करवीर प्रशाला विक्रमनगर, लक्ष्मीपुरी मंडल येथे भाजपा कार्यालय आणि कसबा बावडा येथे लाईन बाजार चौक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी चिकोडे यांनी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांची १५० वी जयंती होत असून, यानिमित्ताने ११ सप्टेंबरपासून प्रत्येकाने वैयक्तिक सहभागाने करावयाचे स्वच्छता अभियान, संपूर्ण प्लास्टिक मुक्ती संकल्प, वन्यजीव संवर्धन कार्यक्रम आणि राष्ट्रीय खेल दिवसपासून सुरू होणाऱ्या हेल्दी इंडिया अभियानाची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी दिली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, आर. डी. पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, मारुती भागोजी, राजाराम शिपुगडे, मामा कोळवणकर, संतोष माळी, भरत काळे, चंद्रकांत घाटगे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, प्रभा इनामदार, आप्पा लाड, नचिकेत भुर्के , विजय आगरवाल, हेमंत कांदेकर, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Man ki Baatमन की बातkolhapurकोल्हापूरBJPभाजपा