शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

ओबीसी प्रवर्गात उच्चवर्गीयांची घुसखोरी थांबवावी, कोल्हापुरातील विजयी मेळाव्यात सात ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:43 IST

ओबीसींसह सर्वच जातीतील नागरिकांची जातनिहाय शिरगणना केंद्राने राष्ट्रीय जनगणना मोहिमेत करावी.

कोल्हापूर : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के ओबीसींना फक्त २७ टक्के एवढे तुटपुंजे आरक्षण मिळत असताना या प्रवर्गात उच्चवर्गीयांची घुसखोरी शासनाने थांबवावी. अशी मागणी एकमुखी ठरावाने करण्यात आली. ओबीसी जनमोर्चा, कोल्हापूरद्वारे ओबीसी राजकीय आरक्षण पुनर्स्थापित झाल्याबद्दल रविवारी बिंदू चौकातील अक्कामहादेवी मंटप, सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात हा निर्धार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सयाजी झुंजार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संघटनेचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी प्रास्ताविक केले. ओबीसी समाजाची आंदोलनाच्या निमित्ताने एक वज्रमूठ तयार झाली आहे. ही अशीच एकत्रित राहावी. असाही निर्धार या मेळाव्यानिमित्त सर्व उपस्थितांनी केला. यानंतर विलास गाताडे, बाबासाहेब काशीद, मारुती टिपुगडे, महिजीबीन शेख, राघू हजारे आणि संभाजी पोवार, माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी ठराव मांडले. तर ज्ञानेश्वर सुतार, बबनराव रानगे, ॲड. किशोर नाझरे, वसंतराव कागले, आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी महापौर मारुतराव कातवरे, सुनील गाताडे, शिवाजीराव माळकर, आनंदराव माळी, दत्ता टिपुगडे, मारुती सुतार, बंकट थोडगे, वसंत वठारकर, सुरेश कोरगावकर, केडीसीसी संचालिका स्मिता गवळी, माजी नगरसेविका उमा बनछोडे, ओबीसी जनमोर्चा महिला प्रदेशाध्यक्षा प्रेमलाताई साळी, पद्मा ढवण आदी उपस्थित होत्या.

ठराव असे

  • ओबीसींसह सर्वच जातीतील नागरिकांची जातनिहाय शिरगणना केंद्राने राष्ट्रीय जनगणना मोहिमेत करावी.
  • देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के ओबीसींना केवळ २७ टक्के आरक्षण असून उच्चवर्गीयांची घुसखोरी शासनाने थांबवावी.
  • जनगणना हा विषय राज्य घटनेच्या केंद्र सूचित आहे. ती केंद्र व राज्य यांच्या समाईक सूचित करण्यासाठी केंद्र सरकारने संविधानात संशोधन करावे.
  • बिहार प्रमाणे राज्य शासनाने जातिनिहाय शिरगणती करून कोणकोणत्या जाती प्रगत आहेत. कोणत्या जाती मागे आहेत.शिक्षण, नोकऱ्या, राजकीय सत्ता, व्यवसाय, धंदे यातील हिस्सेदारी आहे. याची श्वेतापत्रिका काढावी.
  • ओबीसी समाजातील कोणत्याही समाज घटकांवर अन्याय झाल्यास ओबीसी जनमोर्चाद्वारे एकत्रित येऊन लढा द्यावा,
  • जातीचे दाखले बनावट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर बनावट पुराव्यांना ग्राह्य मानून दाखले देणाऱ्या शासकीय अधिकारी व बनावट पुरावे देणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंद करावेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरOBC Reservationओबीसी आरक्षण