शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सीपीआरमधील नवजात अर्भक मृत्यू प्रमाण घटले -आरोग्य विभागाचे यश : तत्पर आरोग्यसेवा, उपचार पद्धतीतील बदलांचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:07 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा, उपचार पद्धतीत झालेल्या बदलांमुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या वर्षभरात नवजात अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली

गणेश शिंदे ।कोल्हापूर : ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा, उपचार पद्धतीत झालेल्या बदलांमुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या वर्षभरात नवजात अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षभरात २५१ अर्भकांचा मृत्यू झाला असून, २०१६ च्या तुलनेत त्यामध्ये ३२ ने घट झाली आहे.

गर्भवती महिलेला वेळेत न मिळणारी आरोग्य सेवा, प्रसूतीदरम्यान मिळणारी तोकडी उपचारपद्धती यामुळे नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढले होते. अर्भक मृत्यू हे राज्याच्या आरोग्य विभागासमोरील आव्हान होते. त्यावर मात करण्याचे काम छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने केले आहे.

महाराष्ट्रात नवजात अर्भकांचा मृत्यू कमी होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सातत्याने यासाठी आरोग्य विभाग विविध योजना, आरोग्य सेवा देत आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामधील अद्ययावत उपकरणे, २४ तास सेवेत असलेले बालरोगतज्ज्ञ, परिचारिका, सर्व महत्त्वाच्या तपासण्या, औषधांची मोफत उपलब्धता, आदी नवजात अर्भकांचा मृत्यूदर कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. नवजात शिशू विभागाची स्थानिक रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर हेरिटेज यांनी ‘ककुन’ या प्रकल्पाकरिता निवड करून हा विभाग अद्ययावत करण्याकरिता मोलाचा हातभार लावला आहे.सन २०१६ या वर्षात १९६२ नवजात अर्भके सीपीआरमध्ये दाखल झाली. त्यातील २८३ मृत झाली. त्याचे प्रमाण १४.४ टक्के आहे.

गेल्यावर्षी १९७१ नवजात अर्भके दाखल झाली. त्यामध्ये २५१ अर्भके मृत झाली. नवजात शिशू विभाग सन १९९७ ला केवळ चार-पाच अर्भकांच्या उपचार करण्यापुरता चालू करण्यात आलेला होता. स्थानिक रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर हेरिटेज यांनी नवजात शिशू विभागाची ‘ककुन’ या प्रकल्पाकरिता निवड करून हा विभाग अद्ययावत करण्याकरिता मोलाचा हातभार लावला आहे.

या विभागामध्ये सध्या पाच व्हेंटिलेटर्स, तीन सिपॅप मशिन्स (प्रामुख्याने प्रीमॅच्युअर अर्भकांकरिता लागणारे व्हेंटिलेटर्स), २५ इन्क्युलेटर्स, मल्टिपॅरा, मॉनिटर्स, सिरिज पंप, फोटो थेरपी उपचार, सेंट्रल आॅक्सिजन, सेंट्रल सेक्शन आदी खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. महिन्याला अंदाजे १५० ते २२५ बालके दाखल होतात व त्यातील दहा ते १५ टक्के बाळांना वाचविण्यात यश येत नाही. ही आकडेवारी राज्यातील इतर शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये हा मृत्यूदर ३० ते ३५ टक्के जास्त आहे, असे प्रशासनाने सांगितले.गर्भवतीने घ्यावयाची काळजी....अतिश्रम टाळले पाहिजे, पोषण संपूर्ण आहार घेतला पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे.वैद्यकीय अधिकाºयांकडून होणाºया रक्त तपासण्या, सोनोग्राफी, रक्तदाब तपासणी, एच.आय.व्ही तपासणी व नियमित लसीकरण. 

नवजात अर्भक मृत्यू प्रमाण रोखणे हे आरोग्य विभागासमोर हे एक आव्हान आहे. त्यासाठी गेले वर्षभर प्रशासनाने जनजागृतीच्या माध्यमातून मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला.- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर, कोल्हापूर.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर