शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

लोकसभा एकदिलाने लढवण्याचा ‘इंडिया’चा निर्धार, सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आदित्य ठाकरेंसोबत बैठक

By समीर देशपांडे | Published: January 10, 2024 3:23 PM

कोल्हापूर : महायुतीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. माजी मंत्री ...

कोल्हापूर : महायुतीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या आघाडीची बैठक बुधवारी सकाळी एका हॉटेलवर झाली. लोकसभेला उमेदवार कोणत्याही पक्षाचा व कोणही असो त्याच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.कॉंग्रेसच्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये महायुतीविरोधातील सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर अशा पद्धतीने एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच सतेज पाटील यांनी ठाकरे आल्याची संधी घेत ही बैठक आयोजित केली. यावेळी भाकपचे नेते दिलीप पोवार यांच्या हस्ते ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि याच पद्धतीने सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात लढा देण्यासाठी वज्रमूठ आवळण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आपण पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे सांगितले. यावेळी ठाकरे यांनी उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मिळणारच नाही; परंतु, तरीही महाविकास आघाडी म्हणून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची इतरांनी भूमिका घेतली पाहिजे, असे स्पष्ट केले.यावेळी खासदार अनिल देसाई, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले, सुनील माेदी, माजी आमदार सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पाेवार, ॲड. महादेवराव आडगुळे, अनिल घाटगे, माकपचे राज्य सचिव उदय नारकर, अतुल दिघे, भाकपचे जिल्हा सरचिटणीस सतीशचंद्र कांबळे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष देसाई, समाजवादी पक्षाचे शिवाजीराव परूळेकर, शेकापचे बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, आपचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, वंचित आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

जनमत संघटित करण्याचे आव्हानसध्याचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाविरोधात जनमतामध्ये संताप आहे. हेच जनमत संघटित करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. हे अजिबात अशक्य नाही. त्यामुळे सर्वांनी एकमुखाने ‘इंडिया’ मजबुतीसाठी कामाला लागा, असे आवाहन यावेळी प्रमुख नेत्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील