शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वन्यजीव-मानव संघर्षात वाढ; ..यामुळे बिबट्या, गवा, अस्वल, हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:54 IST

जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव-मानव संघर्ष गेल्या काही वर्षात वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण आहे.जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. त्यातील राधानगरी आणि दाजीपूर या ३५१.१६ चौ. किलोमीटरवर पसरलेल्या या दोन्ही अभयारण्यांत अनेक वन्यजीवांचा वावर आहे. गव्यांसाठी राखीव असलेल्या या अभयारण्यात वाघाशिवाय बिबट्या, अस्वल, हत्ती यांचाही रहिवास आहे.या वन्यजीवांसाठी अन्न आणि पाण्याचा तो सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याच्या कमतरतेमुळे हे वन्यजीव मानवी वस्तीत शिरु लागले आणि हा वन्यजीव-मानव संघर्ष आणखी तीव्र झाला.सोमवारी चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी भागात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एकजण जखमी झाला. काही महिन्यापूर्वी गव्याने आपले वास्तव्य सोडून शहर गाठले आणि त्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, काहीजण जखमीही झाले. तर हत्तींनीही मार्ग बदलून शहर गाठले. या प्राण्यांमुळे ऊस, शाळू, मका, भात यासारखे पीक उद्ध्वस्त झाल्याच्या घटना राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्यांत घडल्या आहेत.अर्थात या संघर्षात मानवाचाही मोठा हात आहे. खाणकाम, भरमसाठ जंगलतोड, पीक पद्धतीत अमाप बदल, भूजलाचा बेसुमार उपसा, त्यामुळे झालेले पाण्याचे दुर्भीक्ष्य, पाण्याचा खालावलेला दर्जा आदींचाही वाटा आहे. शिवाय बदलत्या निसर्गाचाही तितकाच हातभार आहे.त्यामुळे शेती, माती, हवामान आणि वातावरण यात बदल झाल्याने वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टोकाला जात आहे. लहरी पाऊसमान, बॉक्साईडसारख्या खाणकामांमुळे नष्ट झालेली गायराने, कुरणं, कोरडे पडलेले पाणवठे, कारवीसारखी वनस्पती यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत.

गेल्या दहा वर्षांत मोठी आणि बेसुमार जंगलतोड झाली आहे. त्याचा परिणाम वातावरणाच्या चक्रावर झाला आहे. त्यामुळे प्राण्यांना आवश्यक क्षार आणि पोषक तत्त्वं मिळू शकलेली नाहीत. याशिवाय त्यांच्या अधिवासात मानवाने हस्तक्षेप केला आहे. - अमित सय्यद, वन्यजीव संशोधक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण व संशोधन संस्था. 

कचरा, फेकून दिलेले खाद्य व इतर अनेक कारणांमुळे वन्यजीव मानवी वस्तीजवळ येत आहेत. कोणताही वन्यजीव स्वत:ला धोका असल्याशिवाय हल्ला करत नाही. त्यामुळे स्वत:वर संयम ठेवा, एकट्याने आडवाटेला जाऊ नका, दवंडी द्या, सावध राहा. - सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या