शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव-मानव संघर्षात वाढ; ..यामुळे बिबट्या, गवा, अस्वल, हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:54 IST

जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव-मानव संघर्ष गेल्या काही वर्षात वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण आहे.जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. त्यातील राधानगरी आणि दाजीपूर या ३५१.१६ चौ. किलोमीटरवर पसरलेल्या या दोन्ही अभयारण्यांत अनेक वन्यजीवांचा वावर आहे. गव्यांसाठी राखीव असलेल्या या अभयारण्यात वाघाशिवाय बिबट्या, अस्वल, हत्ती यांचाही रहिवास आहे.या वन्यजीवांसाठी अन्न आणि पाण्याचा तो सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याच्या कमतरतेमुळे हे वन्यजीव मानवी वस्तीत शिरु लागले आणि हा वन्यजीव-मानव संघर्ष आणखी तीव्र झाला.सोमवारी चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी भागात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एकजण जखमी झाला. काही महिन्यापूर्वी गव्याने आपले वास्तव्य सोडून शहर गाठले आणि त्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, काहीजण जखमीही झाले. तर हत्तींनीही मार्ग बदलून शहर गाठले. या प्राण्यांमुळे ऊस, शाळू, मका, भात यासारखे पीक उद्ध्वस्त झाल्याच्या घटना राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्यांत घडल्या आहेत.अर्थात या संघर्षात मानवाचाही मोठा हात आहे. खाणकाम, भरमसाठ जंगलतोड, पीक पद्धतीत अमाप बदल, भूजलाचा बेसुमार उपसा, त्यामुळे झालेले पाण्याचे दुर्भीक्ष्य, पाण्याचा खालावलेला दर्जा आदींचाही वाटा आहे. शिवाय बदलत्या निसर्गाचाही तितकाच हातभार आहे.त्यामुळे शेती, माती, हवामान आणि वातावरण यात बदल झाल्याने वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टोकाला जात आहे. लहरी पाऊसमान, बॉक्साईडसारख्या खाणकामांमुळे नष्ट झालेली गायराने, कुरणं, कोरडे पडलेले पाणवठे, कारवीसारखी वनस्पती यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत.

गेल्या दहा वर्षांत मोठी आणि बेसुमार जंगलतोड झाली आहे. त्याचा परिणाम वातावरणाच्या चक्रावर झाला आहे. त्यामुळे प्राण्यांना आवश्यक क्षार आणि पोषक तत्त्वं मिळू शकलेली नाहीत. याशिवाय त्यांच्या अधिवासात मानवाने हस्तक्षेप केला आहे. - अमित सय्यद, वन्यजीव संशोधक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण व संशोधन संस्था. 

कचरा, फेकून दिलेले खाद्य व इतर अनेक कारणांमुळे वन्यजीव मानवी वस्तीजवळ येत आहेत. कोणताही वन्यजीव स्वत:ला धोका असल्याशिवाय हल्ला करत नाही. त्यामुळे स्वत:वर संयम ठेवा, एकट्याने आडवाटेला जाऊ नका, दवंडी द्या, सावध राहा. - सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या