शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उसाच्या एफआरपीत वाढ; शेतकऱ्यांचे हित परंतु साखर कारखानदारीचे मरण

By विश्वास पाटील | Updated: June 29, 2023 11:46 IST

चार वर्षात साखरेच्या विक्री दरात वाढ नाही

विश्वास पाटीलकोल्हापूर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून उसाच्या एफआरपीमध्ये १०५० रुपये टनाला वाढ झाली. परंतु साखरेचा विक्री दर वाढवायला मात्र केंद्र सरकार तयार नाही. साखरेचा दर वाढला की महागाई वाढते, असे सरकारला वाटते. त्यामुळे देशातील साखर कारखानदारीने हा दर ३६०० रुपये करण्याची वारंवार मागणी करूनही सरकार ढिम्मच आहे. त्यामुळे मुख्यत: सहकारी साखर कारखानदारीवर मरण ओढवले आहे.केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा एफआरपी २१०० रुपये होती. ती आगामी वर्षासाठी ३१५० रुपये करण्यात आली. बुधवारीच कृषी मूल्य आयोगाने त्याची घोषणा केली. या दहा वर्षात केंद्राने तब्बल आठ वेळा एफआरपीमध्ये वाढ केली. साखर कारखानदारीच्या इतिहासात साखरेचा विक्री दर केंद्र शासनाने कधीच निश्चित केलेला नव्हता. परंतु भाजप सरकारने जून २०१८ मध्ये प्रथमत: तो निश्चित केला आणि टनास २९०० रुपयांच्या खाली साखर विकता येणार नाही, असे निर्बंध घातले. इतिहासाने नोंद घ्यावी इतका चांगला हा निर्णय आहे. साखर कारखानदारीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला असताना केंद्राने हा विक्री दर निश्चित केला. लगेच फेेब्रुवारी २०१९ मध्ये हाच दर ३१०० रुपये केला. मागच्या चार वर्षात एफआरपी ४०० रुपयांनी वाढली आणि साखरेचा विक्री दर मात्र जुनाच आहे. तो किमान ३६०० रुपये करावा, यासाठी देशातील साखर कारखानदारीच्या सर्वच शिखर संस्थांनी केंद्राकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्राचे हे धोरण कारखानदारीच्या मुळावर उठणारे आहे. कारण साखरेला चांगला दर मिळाल्याशिवाय एफआरपी देणे शक्य नाही. त्या दबावाने कारखानदारी कर्जाच्या ओझ्याखाली जात आहे.

झळ नाही..मध्यमवर्गीय ग्राहकाला महागाईची झळ बसू नये, यासाठी केंद्र सरकार हा दर वाढवत नसल्याचे समर्थन चुकीचे आहे. कारण सर्वसाधारण एका कुटुंबाला महिन्याला ५ किलो म्हणजे वर्षाकाठी ६० किलो साखर लागते. त्याच्या दरात किलोस दहा रुपये वाढ केली तरी त्याचे बजेट ६०० रुपयांपेक्षा जास्त वाढत नाही. या ग्राहकाचे एका वेळच्या हॉटेलिंगचे बिलही याच्या तिप्पट असते.

कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार, ज्यावेळी एफआरपी वाढविल्यावर साखरेच्या विक्री दरातही वाढ करणे जरुरीचे आहे. परंतु तसे घडलेले नाही. त्यामुळे कारखान्यांना तोटा सहन करावे लागत आहेत. - पी.जी.मेढे, साखर उद्योगाचे तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने