शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
5
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
6
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
7
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
8
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
9
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
10
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
11
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
12
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
13
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
14
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
15
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
16
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
17
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
18
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
19
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
20
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका

रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या समाधी स्मारकाचे पन्हाळ्यात उद्या लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 4:41 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या समाधी स्मारकाचे पन्हाळ्यात उद्या लोकार्पणनील पंडित बावडेकर यांनी दिली माहिती, पन्हाळ्यात होणार सोहळा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.सोमेश्वर तलावाशेजारील समाधी परिसरात सकाळी ११.३० वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा सोहळा होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार असतील. यावेळी माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवकालीन मराठा राजे व सरदार घराण्यातील वंशज उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्रशालेतील सभागृहात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे ‘मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित असतील.या कार्यक्रमाला फलटणचे नाईक निंबाळकर, भोरचे पंत सचिव, हंबीरराव मोहिते, सेनापती धनाजीराव जाधवराव, कान्होजी आंग्रे, सरदार शिरोळे, पेशवे मोरोपंत पिंगळे, खंडेराव दाभाडे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, होळकर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, विठ्ठल विचूरकर, अंताजी गंधे, सरदार रास्ते, सरदार पेठे, सरदार बावणे, तानाजी मालुसरे, सरदार गरुड, ढमाले देशमुख, नातू, हिरोजी इंदलकर अशा राजे व सरदार घराण्यांतील वंशज उपस्थित राहणार आहेत.समाधी स्मारक प्रकाशातरामचंद्रपंत बावडेकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य होते. पुढे संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर त्यांनी कठीण परिस्थितीत स्वराज्य सावरण्याचे व टिकविण्याचे कार्य केले. त्यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी ‘हुुकुमतपनाह’ हा सर्वोच्च किताब दिला.

रामचंद्रपंत यांचे ८ फेब्रुवारी १७१६ रोजी निधन झाले. त्याच कालावधीत पन्हाळ्यात त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यावर त्यांचे नावही कोरण्यात आले आहे. कालौघात समाधी विस्मृतीत गेली. सबनीस व मु. गो. गुळवणी यांनी ती पहिल्यांदा प्रकाशात आणली. त्यानंतर पुढे इतिहास संशोधकांनी समाधिस्थळाचे महत्त्व व रामचंद्रपंतांचे कार्यकर्तृत्व उजेडात आणले.२० लाख खर्चून जीर्णोद्धारट्र्स्टने स्वनिधीतून २० लाख रुपये खर्चून समाधी स्मारकाचा जीर्णोद्धार केला आहे. हे काम दीड वर्ष सुरू होते. जीर्णोद्धाराच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरात खाली दगड, स्मारकासमोर कमान व छोटेखानी संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासोबत परिसरात आणखी दोन समाध्या आहेत. या स्मारकांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :historyइतिहासkolhapurकोल्हापूर