शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

स्वाभिमानीचं ठरलं..यंदा एफआरपी प्लस ३५० घेणारच; जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत राजू शेट्टींनी फुंकले रणशिंग

By विश्वास पाटील | Updated: October 15, 2022 17:58 IST

परिषदेत सतिश काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तुफान टीका केली.

विश्वास पाटीलकोल्हापूर : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसासाठी टनाला एकरकमी एफआरपी व जादा ३५० रुपये घेतल्याशिवाय कांड्याला कोयता लावू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील विक्रम हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या विराट ऊस परिषदेत केली. या परिषदेला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह शेजारच्या कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. शेट्टी संपले असा अपप्रचार करणाऱ्यांना त्यांनी अजूनही ऊसाच्या व एकूणच शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या चळवळीत आपणच विश्वासार्ह असल्याचे दाखवून दिले. या परिषदेत सतिश काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तुफान टीका केली.स्वाभिमानीच्या ऊस परिषदेतील हवा काढता यावी यासाठी यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा अगोदरच केली होती. परंतू त्याला शेतकऱ्यांनी जूमानले नाही. एफआरपी तर घेवूच परंतू त्याशिवायही शेट्टी जास्त कितीची मागणी करतात याकडे लक्ष लागले होते. त्यांनी आगामी हंगामासाठी ३५० रुपये जास्त मागितलेच शिवाय मागील हंगामातील तूटलेल्या ऊसासाठी २०० रुपये तातडीने देण्याची मागणी केली.महाविकास आघाडीने कारखान्यांना तीन टप्प्यात एफआरपी देण्याची तरतूद केली होती त्यामध्ये लगेच दुरुस्ती करावी अशी मागणी परिषदेने केली. राज्यातील सर्व सहकारी व खासगी कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करून वैैद्यमापन विभागाकडून वजनकाट्यांच्या कॅलिब्रेशनमध्ये एकसुत्रता आणण्याची मागणी परिषदेत सर्वच वक्त्यांनी केली.परिषदेतील अन्य ठराव :

  • ऊसदर नियंत्रण अध्यादेश १९६६ अ अस्तित्वात आला तेव्हा रिकव्हरी बेस ८.५ टक्के होता. तोच कायम ठेवून नंतरच्या सर्व दुरुस्त्या मागे घ्या.
  • केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ३५०० रुपये करावा.
  • साखरेच्या निर्यातीस कोटा पध्दती न ठेवता खुले परवाना मान्यता द्यावी.
  • गुऱ्हाळ प्रकल्पांना इथेनॉल उत्पादनाची परवानगी द्या.
  • ऊस तोडणी यंत्रणांने तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटचे वजन ४.५ टक्के एवढी तोडणी घट धरण्यात येते त्याऐवजी १.५ टक्के करण्यात यावी.
  • केंद्र सरकारने कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर नाबार्ड कडून ३ टक्के व्याज दराने तारण कर्ज द्यावे.
  • कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची एक इंचानेही वाढवण्यास परिषदेचा विरोध राहील.
  • केंद्र सरकाने पशुधन विमा पूर्ववत सुरु करावा.
  • गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळासाठी ऊस दरातून कपात करून घेण्यात येणारी रक्कम साखर कारखान्यांना मजूर पूरवल्यानंतरच मगच कपात करण्यात यावी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने