शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

धरणग्रस्तांनी गनिमीकाव्याने उचंगी धरणाची घळभरणी पाडली बंद, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 16:01 IST

घळभरणीसाठी धरणस्थळावर आणलेल्या सर्व मशीनरी धरणग्रस्तांनी पिटाळून लावल्या. 

सदाशिव मोरे

आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी धरणाच्या घळभरणीचे काम धरणग्रस्तांनी गनिमीकाव्याने येऊन बंद पाडले. पुनर्वसन न झाल्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले होते. घळभरणीसाठी धरणस्थळावर आणलेल्या सर्व मशीनरी धरणग्रस्तांनी पिटाळून लावल्या. 

त्यानंतर धरणग्रस्तांची बैठक झाली. बैठकीत पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत जो पर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत धरणाचे काम बंदच राहील. आधी पुनर्वसन मगच धरण हा कायदा असतानाही तो पायदळी तुडवून धरणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. पोलिसी खाक्या दाखवून धरणाची घळभरणी सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराही यावेळी दिला.उचंगीचे धरणग्रस्त चाफवडेतून मोर्चाने धरणस्थळावर आले. मोर्चात धरणग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो, आधी पुनर्वसन मगच धरण, पोलिसी खाक्या दाखवून काम करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो यासह विविध घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने आक्रमक झालेल्या दिसत होत्या. 

धरण स्थळावर पाटबंधारे विभाग जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता विनया बदामी, उपविभागीय अभियंता विजय राठोड यांनी धरणग्रस्तांशी चर्चा केली. मात्र धरणग्रस्त पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीवर शेवटपर्यंत ठाम राहिले. धरणग्रस्त आजच्या मोर्चात काठ्या घेऊनच सहभागी झाले होते. त्यामुळे मशिनरीच्या चालकांनी आपली मशीन तातडीने धरण स्थळावरून हलविले. यावेळी धरणग्रस्तांनी काही चालकांना काठीचा प्रसादही दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर