शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

इचलकरंजीत कृत्रिम कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन, प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 11:20 IST

शहापूर खणीची सद्य:स्थिती पाहता तेथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सर्व स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत विसर्जन करण्याबाबत चर्चा सुरू झाली. हा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला.

इचलकरंजी : शहरातील गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीवेस नाका ते यशोदा पूल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या व्यासाचे व जास्त खोलीचे कृत्रिम कुंड महापालिका प्रशासन तयार करणार. त्याठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची सोय केली जाणार असून, कुंड भरल्यास उर्वरित मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.

शहरातील गणेशमूर्ती विसर्जनसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आमदार आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक सुधाकर देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, अप्पर तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते.

शहापूर खणीची सद्य:स्थिती पाहता तेथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सर्व स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत विसर्जन करण्याबाबत चर्चा सुरू झाली. हा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला. पर्यावरणमंत्र्यांनी बैठक घेतली आणि सर्वमान्य तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार याबाबत प्रशासनाने महापालिकेत आमदार आवाडे यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीमध्ये संपूर्ण ऊहापोह करण्यात आला. त्यानंतर परंपरागत शिवतीर्थ ते नदीवेस नाका असा विसर्जनाचा मार्ग कायम राहील.

नदीवेस नाक्यापासून यशोदा पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला शक्य त्याठिकाणी मोठे कृत्रिम कुंड व तलाव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शहरातही ठिकठिकाणी विविध शंभर कृत्रिम विसर्जन कुंड तयार करून त्यामध्ये पंचगंगा नदीचे पाणी सोडून भाविकांना तेथे विसर्जनाचे आवाहन करण्याचे ठरले. कुंडामध्ये विसर्जन केलेल्या व दान केलेल्या गणेशमूर्तींचे योग्य ठिकाणी विसर्जित केल्या जातील, याची पुरेपूर काळजी प्रशासन घेईल. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी व्यवस्थांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

महापालिकेने युद्धपातळीवर काम पूर्ण करून आवश्यक तेथे कृत्रिम तलाव तयार करावेत. योग्य पर्यायी व्यवस्था उभारल्यास त्याला सहकार्य करू परंतु संबंधित तलाव व कुंड भरल्यास पंचगंगा नदीत विसर्जन केले जाईल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.

प्रशासनाने सोय केलेल्या शहापूर खणीत प्रदूषित पाणी असल्याने जनभावना दुखावली जाऊ शकते. त्यामुळे त्याला पर्याय देण्याची गरज होती. आज झालेल्या बैठकीत जे पर्याय सुचवले आहेत, ते आमदार आवाडे यांनी मान्य केले आहेत. साधारण तीन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून, जिल्ह्यातील मूर्ती दान चळवळीची केंद्र शासनानेही दखल घेतली आहे. या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून, इचलकरंजी हे संवेदनशील शहर असल्याने उत्सवकाळात कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. सार्वजनिक मंडळांनीही जलकुंडांचा वापर करावा तसेच आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले.

शहापूर खणीची पाहणी

बैठकीस उपस्थित असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी व आमदार आवाडे यांनी बैठकीनंतर शहापूर खणीची पाहणी केली. खणीमध्ये अतिशय प्रदूषित पाणी असून, पाण्यामध्ये तुरटी व ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छता करावी तसेच कारंजा व सुशोभिकरण करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

विविध ठिकाणी पाहणी

शहरातील नदीवेस परिसरासह मिरवणूक मार्ग व विविध कुंड निर्माण करण्यासाठी योग्य असणाऱ्या ठिकाणी पथकाने पाहणी केली तसेच ताबडतोब कुंड तयार करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवichalkaranji-acइचलकरंजी