शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इमान मातीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:50 IST

फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्र, अमरावती येथे दुपारच्या जेवणासाठी मित्रांच्या सोबत गेलो होतो. त्या फार्म हाऊसमध्ये एक विदेशी महिला ...

फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्र, अमरावती येथे दुपारच्या जेवणासाठी मित्रांच्या सोबत गेलो होतो. त्या फार्म हाऊसमध्ये एक विदेशी महिला लहान कुत्र्याला झालेल्या जखमेवर औषधोपचार करत होती. त्यात ती तल्लीन झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कुत्र्याच्या दु:खासाठी तिची संवेदनशीलता मनामध्ये उत्सुकता निर्माण करणारी होती. मी सहज चौकशीला सुरुवात केली. ती त्या फार्म हाऊसची मालकीण होती. तिचा पती पंकज सावरकर हा अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यातील तरुण. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर तो नोकरीच्या निमित्ताने पोर्तुगालला गेला होता आणि तिथल्या वास्तव्यामध्ये या तरुणीशी त्याचा प्रेमविवाह झाला होता. तिथं पंकज राहत असताना मायदेशामध्ये राहत असलेल्या आई-बाबांविषयीची त्याच्या मनामध्ये ओढ होती.लहानपणापासून मातीच्या निसर्गाची आवड असलेला पंकज पोर्तुगालमध्ये दीर्घकाळ स्थिर होऊ शकला नाही. वृद्धापकाळी आई-बाबांच्या जवळ असायला हवं, त्यांची सेवा करता यायला हवी म्हणून मोठ्या पगाराची नोकरी सोडून हे दोघेजण भारतामध्ये परत आले. इथे आल्यानंतर प्रश्न होता पोटा-पाण्याचा. सुरुवातीला त्यांनी चहाची टपरी टाकली. या टपरीवर नाष्टा, चहाची व्यवस्था करून त्याने सुरुवात केली. सेवाभावी वृत्ती हसरा चेहरा आणि प्रत्येकाबरोबर प्रेमाने वागणं यातून त्यांच्या व्यवसायाची वाढ झाली. आता त्याच्या व्यवसायात जोर धरला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत या फार्म हाऊसवर हाऊसफुल्ल गर्दी असते. या व्यवसायाच्या बळकटीकरण यामध्ये त्यानं या तत्त्वाची जोपासना केली आहे. ती मोठी विलक्षण आहे. फार्म हाऊसमध्ये प्रवेश करतानाच काहीच छान उपदेशपर पाट्या वाचायला मिळतात. इथं मद्यसेवनास मनाई आहे. आपण आपल्या घरचं जेवण आणून इथं खाऊ शकता. इथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आत भारतीय बैठक आहे. टेबल-खुर्ची यांची बैठक आहे. ज्याला जसे हवे तसे तो बैठकीचा वापर करु शकतो. इथले सगळे पदार्थ आई-बाबांचे रेसिपी तयार होतात. स्वत: आई इथल्या प्रत्येक पदार्थाचा मसाला तयार करते. इथलं वातावरण अगदी अनौपचारिक आहे. सर्वप्रकारचे महाराष्ट्रीय पदार्थ इथे मनापासून तयार करून दिले जातात. सात-आठ मुलींसह आया-बहिणी खूप आनंदानं हा स्वयंपाक करत असतात. इथे मालक आणि नोकर असा भेदच नाही. प्रसन्नचित्ताने आनंदाने एकमेकांशी वागत असतात आणि सेवा करतात. चर्चा करत असताना पंकज असं सांगत होता की काल रात्री इतकी गर्दी होती की, नऊ वाजता आलेल्या अतिथींना मी बारा वाजेपर्यंत जेवण देऊ शकलो नाही. मी त्यांना अनेक वेळेला विनंती केली की, खूप उशीर होईल आपण दुसरीकडे जा; पण तीन तासांची वाट पाहणं त्यांनी मान्य केलं. पण, इथेच भोजन घेऊन तृप्त झाले ही माझ्या यशाची पावती आहे. सर्वसण अतिथींसोबत आनंदाने साजरे केले जातात. आपल्या एकट्याच्याच व्यवसायाची वृद्धी हा हेतू पंकजचा नाहीये. खेड्यातून येणाऱ्या कोणत्याही शेतकºयाला आपल्या मालाची विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी त्यानं मोफत स्टॉलची व्यवस्था केली आहे. एखाद्या नवीन उद्योजकाला आपल्या मालाची जाहिरात करायची असेल तर त्यासाठी त्याच्या भिंतीचा वापर तो मोफत करून देतो. आम्ही सर्वजणांनी विकसित व्हायचं आहे, हा त्याचा ध्यास आहे. अख्ख जग फिरल्यानंतर जगात सुरू असलेला व्यवहार पंकजमध्ये यायला हवा होता; पण इथल्या व्यवसायामध्ये व्यवहार नाहीच आहे. इथं आहे ओलावा, इथं आहे स्वत:हून इतर आणि जगावं ही शुद्ध भावना परदेशात गेल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी असताना तिथं स्थिर होऊ शकला असता, पण आई-बाबांची सेवा यासाठी परत आलेला पंकज जगापेक्षा वेगळा आहे. एका बाजूला विमानतळावरच आई-बाबांना सोडून जाणारी मुलं फक्त बाळंतपणासाठी परदेशात आपल्या आई-बाबांना बोलणारी मुलं इथल्या वृद्धाश्रमांमध्ये आई-बाबांना ठेवून वर्ष-वर्ष विचारपूस करणारी मुलं हे पाहिलं. पंकज हे जगणं किती उत्कट जगतो याची जाणीव होते. या व्यवसायातून तो रक्ताची नाती जपतो आहे, पण जोडलेली नाती ही चिरंतन ठेवतो आहे. या व्यवसायात परदेशी असलेली त्याची पत्नी जीवाभावापासून त्याला साथ देते आहे. हा बंध पाहिल्यानंतर ते एकमेकांसाठी जगत आहेत याचा अनुभव येतो. पंकजसारखी तरुणाई अनेकांना जीवनाचा अर्थ समजावून जाते. रात्रं-दिवस आपल्या व्यवसायात वाढ होत असताना निर्माण झालेली नाती ही जपण्यात त्याला मोठा आनंद आहे. चेहºयावरचे समाधान येणाºया माणसांची मनापासून घेतली जाणारी काळजी आणि अखंड कष्टाची तयारी हे पंकज व्यक्तिगत जीवनाचे आणि त्याच्या व्यवसायाचे यश आहे. भोगवादी समाजामध्ये स्वत: जगून इतरांना जगण्याची प्रेरणा देणारा पंकज हा वेगळाच आहे, अशी विचाराची वाट चोखाळणारी पिढी तयार व्हावी आणि तुकोबांच्या म्हणण्यानुसार आपण तरला विशेष काय अनेकांना तारतो हे विशेष.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)