शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'एमएच नऊ'चा अभिमान, सोबतच जपा कोल्हापूरची शान - सुनील लिमये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:00 IST

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील ६० नामवंतांचा 'ब्रँड कोल्हापूर' पुरस्कार देऊन गौरव

कोल्हापूर : देशभरात कुठेही गेलो तरी 'एमएच-९' मुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. या 'एमएच नऊ'चा अभिमान आहे. तो मिरवलाच पाहिजे, मात्र, एखाद्याबद्दल प्रेम व्यक्त करायचे असेल तरी आपल्या भाषेचा लहेजा हा रागासारखाच वाटतो. त्यामुळे कोल्हापूरची शान अधिक वाढवायची असेल तर बाहेरील लोकांशी बोलताना थोडं प्रेमाने बोला असा प्रेमळ सल्ला राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व कोल्हापूरचे सुपुत्र सुनील लिमये यांनी गुरुवारी कोल्हापूरकरांना दिला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील ६० नामवंतांचा 'ब्रँड कोल्हापूर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात हॉकीच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वेचलेले कुमार आगळगावकर व भरतकाम कलेला वाहून घेतलेल्या विजयमाला बाबुराव मेस्त्री (पेंटर) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.लिमये म्हणाले, जातीपातीच्या पलीकडे जाऊन कोल्हापुरने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा विचार घेऊन सामाजिक भान जपणारा हा जिल्हा आहे. 'ब्रँड कोल्हापूर'मुळे पुरस्कारकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे, कोल्हापुराचा हा ब्रॅड जपा, तो वाढवा.आ.सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरकरांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याचा सन्मान करण्यासाठीच 'ब्रँड कोल्हापूर' उपक्रम सुरु केला. यामुळे इतरांना प्रेरणा मिळत आहे. खेळाडूंना ज्या सुविधा कमी असतील त्या देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. आमदार ऋतुराज पाटील यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमसर्च अध्यक्ष संजय शेटे, साखरतज्ज्ञ विजय औताडे, क्रेडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, प्रसन्न कुलकर्णी, अजय कोराणे, अमर आडके यांच्यासह विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. भरत दैनी यांनी स्वागत केले. अनुराधा कदम यांनी ओळख करून दिली.

राजू राऊत, सिकंदरसह ६ जणांचा विशेष सत्कारशाहीर राजू राऊत, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, स्वप्निल पाटील, सचिन सूर्यवंशी, वैष्णवी पाटील व सचिन कुंभोजे यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.

यांचा झाला 'ब्रँड कोल्हापूर'ने गौरवहर्निश सवसानी, डॉ. करण देवणे, विनायक हेगाणा, निकेत दोशी, राखी पारख,रावी किशोर, विशाल गुडुळकर, वासिम मुल्लानी, मधुर चांदणे, अनुष्का नागोंडा पाटील, नागेश हंकारे, इंद्रजित भोसले, संजय पटेल, जिनेंद्र सांगावे, कल्याणी पाटील, गौरव घेवडे, अक्षय कारेकर, प्रसाद क्षीरसागर, अपूर्वा शेलार, दिग्विजय पाटील, आरती पाटील, सोनबा गोंगाने, अभिज्ञा पाटील, स्वाती शिंदे, अश्विनी मळगे, सोनल सावंत, स्वप्नाली वायदंडे, महेश गवंडी, स्वप्निल जंत्रे, शिवम गेजगे, यशराज पाटणकर, तुषार पाटील, अभय हावळ, प्रतीक्षा पोवार, हर्षदा परिट, सुमंत कुलकर्णी, सृष्टी रेडेकर, शुक्ला बीडकर, सुजित तिकोडे, अनिकेत माने,

दीक्षा शिरगावकर, सोनम मस्कर, ऋतुजा पाटील, निखिल कदम, पवन माळी, अरबाज पेंढारी, संकेत साळोखे, पार्थ मिरगे, रिया पाटील, ऋतुराज पाटील, विराजबाला भोसले, शुभांगी पाटील, धनश्री इंगळे, ऋतुराज इंगळे, रिया नितीन पाटील, सुजल पाटील, हर्षवर्धन कदम, सार्थक गायकवाड, ज्ञानेश्वरी पाटील, संतोष रांजगणे या ६० जणांचा 'ब्रँड कोल्हापूर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर