शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

चंद्रदीप नरकेंनी कुंभी कारखान्याचे वाटोळे केले, परिवर्तन न झाल्यास देवही वाचवणे अशक्य; बाळासाहेब खाडेंचा आरोप

By राजाराम लोंढे | Updated: February 9, 2023 14:44 IST

‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्ज

राजाराम लोंढेकोल्हापूर : कुंभी कासारीची आम्ही सत्ता सोडताना एक रुपयाचेही कर्ज नव्हते. मात्र, गेल्या अठरा वर्षांत चंद्रदीप नरके यांनी कारखान्यावर तब्बल ३०० कोटींचे कर्ज केले. कारखान्याला लागलेली घरघर थांबवण्यासाठी परिवर्तनाची गरज असून तसे झाले नाहीतर ‘कुंभी’चे खासगीकरण होण्यापासून देवही वाचवणार नाही, असा इशारा देत स्वत:च्या आमदारकीसाठी नरके यांनी चांगल्या कारखान्याचे वाटोळे केल्याचा घणाघाती आरोप विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते बाळासाहेब खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.‘कुंभी’च्या सभासदांनी १९९९ ते २००४ या कालावधीत आमच्याकडे सत्ता दिली, त्यावेळी २८ कोटींचे शॉर्ट मार्जिन होते आणि एक लाख ९५ हजार टन साखर शिल्लक होती. त्यानंतरच्या पाच वर्षांत पारदर्शक कारभार करत कारखाना कर्जमुक्त केला. मात्र, पाच वर्षांत पाच अध्यक्ष केले म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी गेल्या १८ वर्षात कारखाना डबघाईला आणला. ‘दालमिया’सह परिसरातील साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्प ‘बीओटी’वर केला, ते आता कर्जमुक्तही झाले. 

मात्र, ‘कुंभी’ने कर्ज काढून प्रकल्प उभा केल्याने आर्थिक ताण आला. कर्मचाऱ्यांचे पगार थकले, ऊसतोडणी व वाहतूकदारांचे पैसे वेळेत मिळेनात. कामगार सोसायटीचे १८ कोटींचे कर्ज थकल्याने कर्मचाऱ्यांच्या ठेवी अडकल्याने कर्मचारी दुहेरी संकटात सापडले. आम्ही सुरू केलेल्या निवासी शाळेत गेल्या १८ वर्षांत एक इयत्ताही चंद्रदीप नरकेंना जोडता आली नाही. मुले अक्षरश: खुराड्यात असून स्वत:च्या मालकीचे मात्र कारखान्याच्या पैशावर सुरू असलेल्या विद्यानिकेतनमधून ही मंडळी लाखो रुपये घरी घेऊन जात असल्याचा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला.

कामगारांवर रोजगारला जाण्याची वेळ‘कुंभी’च्या इतिहासात कामगारांचा पगार कधी थकला नाही. सध्या अकरा महिन्याचा पगार नसल्याने कामावर रजा टाकून दुसरीकडे रोजगाराला जाण्याची वेळ कामगारांवर आणणाऱ्यांना ‘कुंभी’तून हद्दपार करा, असे आवाहन बाळासाहेब खाडे यांनी केले.‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्जयापूर्वी राज्य बँक आर्थिक स्थिती पाहूनच ‘कुंभी’ला कर्ज देत, कारखाना जिल्हा बँकेकडे आल्यामुळेच उसाची बिले देत आहेत. यासाठी आमदार पी.एन. पाटील व आमदार विनय काेरे यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळेच कर्ज मिळाल्याचे खाडे यांनी सांगितले.खुद्द तोडीमुळेच कारखाना सुरूकारखान्याचे ऊस तोडणी पाळीपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप आडसाली लागणी शिवारात उभ्या आहेत. तोडणी व वाहतूकदारांची बिले व कमिशन वेळेत मिळत नसल्याने कोणी ऊस तोडेना. सध्या केवळ खुद्द तोड सुरू असल्यानेच कारखाना सुरू असल्याचे खाडे यांनी सांगितले.

घरच्यांचाही विश्वास गमावलाचंद्रदीप नरके हे ‘कुंभी’ वाचवू शकत नसल्याने त्यांनी सभासदांचा विश्वास गमावला आहेच, आता घरच्यांचाही विश्वास गमावला आहे. ‘शाहू’ आघाडीच कारखाना वाचवू शकते, हा विश्वास ज्येष्ठ नेते अरुण नरके यांना असल्याने त्यांनी पाठिंबा दिल्याचे बाळासाहेब खाडे यांनी सांगितले.सत्ता द्या, हे करतो....

  • काटकसरीच्या कारभारातून ‘कुंभी’ कर्जमुक्त करू.
  • अध्यक्षांसह संचालकांच्या वाहनांवर एक रुपयाही खर्च करणार नाही.
  • शेतावरील कर्मचाऱ्यांना कारखान्यात आणू.
  • ‘कुंभी’ची शाळा अद्यावत करू.
  • ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम
  • ऊस विकास योजना राबवू.
  • बेणे प्लॉट करणार. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक