शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

चंद्रदीप नरकेंनी कुंभी कारखान्याचे वाटोळे केले, परिवर्तन न झाल्यास देवही वाचवणे अशक्य; बाळासाहेब खाडेंचा आरोप

By राजाराम लोंढे | Updated: February 9, 2023 14:44 IST

‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्ज

राजाराम लोंढेकोल्हापूर : कुंभी कासारीची आम्ही सत्ता सोडताना एक रुपयाचेही कर्ज नव्हते. मात्र, गेल्या अठरा वर्षांत चंद्रदीप नरके यांनी कारखान्यावर तब्बल ३०० कोटींचे कर्ज केले. कारखान्याला लागलेली घरघर थांबवण्यासाठी परिवर्तनाची गरज असून तसे झाले नाहीतर ‘कुंभी’चे खासगीकरण होण्यापासून देवही वाचवणार नाही, असा इशारा देत स्वत:च्या आमदारकीसाठी नरके यांनी चांगल्या कारखान्याचे वाटोळे केल्याचा घणाघाती आरोप विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते बाळासाहेब खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.‘कुंभी’च्या सभासदांनी १९९९ ते २००४ या कालावधीत आमच्याकडे सत्ता दिली, त्यावेळी २८ कोटींचे शॉर्ट मार्जिन होते आणि एक लाख ९५ हजार टन साखर शिल्लक होती. त्यानंतरच्या पाच वर्षांत पारदर्शक कारभार करत कारखाना कर्जमुक्त केला. मात्र, पाच वर्षांत पाच अध्यक्ष केले म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी गेल्या १८ वर्षात कारखाना डबघाईला आणला. ‘दालमिया’सह परिसरातील साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्प ‘बीओटी’वर केला, ते आता कर्जमुक्तही झाले. 

मात्र, ‘कुंभी’ने कर्ज काढून प्रकल्प उभा केल्याने आर्थिक ताण आला. कर्मचाऱ्यांचे पगार थकले, ऊसतोडणी व वाहतूकदारांचे पैसे वेळेत मिळेनात. कामगार सोसायटीचे १८ कोटींचे कर्ज थकल्याने कर्मचाऱ्यांच्या ठेवी अडकल्याने कर्मचारी दुहेरी संकटात सापडले. आम्ही सुरू केलेल्या निवासी शाळेत गेल्या १८ वर्षांत एक इयत्ताही चंद्रदीप नरकेंना जोडता आली नाही. मुले अक्षरश: खुराड्यात असून स्वत:च्या मालकीचे मात्र कारखान्याच्या पैशावर सुरू असलेल्या विद्यानिकेतनमधून ही मंडळी लाखो रुपये घरी घेऊन जात असल्याचा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला.

कामगारांवर रोजगारला जाण्याची वेळ‘कुंभी’च्या इतिहासात कामगारांचा पगार कधी थकला नाही. सध्या अकरा महिन्याचा पगार नसल्याने कामावर रजा टाकून दुसरीकडे रोजगाराला जाण्याची वेळ कामगारांवर आणणाऱ्यांना ‘कुंभी’तून हद्दपार करा, असे आवाहन बाळासाहेब खाडे यांनी केले.‘पी.एन., कोरे’ यांच्यामुळेच ‘कुंभी’ला कर्जयापूर्वी राज्य बँक आर्थिक स्थिती पाहूनच ‘कुंभी’ला कर्ज देत, कारखाना जिल्हा बँकेकडे आल्यामुळेच उसाची बिले देत आहेत. यासाठी आमदार पी.एन. पाटील व आमदार विनय काेरे यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळेच कर्ज मिळाल्याचे खाडे यांनी सांगितले.खुद्द तोडीमुळेच कारखाना सुरूकारखान्याचे ऊस तोडणी पाळीपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप आडसाली लागणी शिवारात उभ्या आहेत. तोडणी व वाहतूकदारांची बिले व कमिशन वेळेत मिळत नसल्याने कोणी ऊस तोडेना. सध्या केवळ खुद्द तोड सुरू असल्यानेच कारखाना सुरू असल्याचे खाडे यांनी सांगितले.

घरच्यांचाही विश्वास गमावलाचंद्रदीप नरके हे ‘कुंभी’ वाचवू शकत नसल्याने त्यांनी सभासदांचा विश्वास गमावला आहेच, आता घरच्यांचाही विश्वास गमावला आहे. ‘शाहू’ आघाडीच कारखाना वाचवू शकते, हा विश्वास ज्येष्ठ नेते अरुण नरके यांना असल्याने त्यांनी पाठिंबा दिल्याचे बाळासाहेब खाडे यांनी सांगितले.सत्ता द्या, हे करतो....

  • काटकसरीच्या कारभारातून ‘कुंभी’ कर्जमुक्त करू.
  • अध्यक्षांसह संचालकांच्या वाहनांवर एक रुपयाही खर्च करणार नाही.
  • शेतावरील कर्मचाऱ्यांना कारखान्यात आणू.
  • ‘कुंभी’ची शाळा अद्यावत करू.
  • ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम
  • ऊस विकास योजना राबवू.
  • बेणे प्लॉट करणार. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक