शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:22 IST

कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत

कोल्हापूर : शक्तिपीठ हटाव, कोल्हापूरला महापुरापासून बचाव, शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी देऊन येथील अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. आई अंबाबाई शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, उदं गं आई उदं, असा गजर आणि गणपतीची आरती करून करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घातले.शक्तिपीठ महामार्ग करताना पुन्हा भराव टाकावा लागणार आहे. असे झाले, तर बिंदू चौकापर्यंत महापुराचे पाणी येईल. निम्मे कोल्हापूर महापुरात जाईल, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी माजी खासदार शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगलीसह बारा जिल्ह्यांतील जनतेचा विरोध आहे. मात्र, कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत. ते शक्तिपीठला समर्थन करून कोल्हापूरच्या महापुराची स्थिती आणखी गंभीर करणार आहेत. सध्याचा महामार्ग करताना मातीचा भराव टाकल्याने २०१९ साली जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आले होते. शक्तिपीठ महामार्ग करताना पुन्हा भराव टाकावा लागणार आहे.

वाचा-  शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती असे झाले, तर बिंदू चौकापर्यंत महापुराचे पाणी येईल. निम्मे कोल्हापूर महापुरात जाईल. शक्तिपीठला उपमार्ग म्हणून कणेरीमठ ते जोतिबा असा एक नवा रस्ता करण्याचे नियोजन आहे. या रस्त्यामुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान होणार आहेत. भोगावती, कासारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी भरावा टाकला, तर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबून राहणार आहे. यावेळी उद्धवसेनेचे विजय देवणे, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, अजित पोवार आदी सहभागी झाले होते.

बालिश मागणी..राज्य सरकार नियोजित महामार्ग करणार आहे, म्हणून कर्नाटकातून चंदगडमार्गे महामार्ग करता येत नाही. तरीही कोणाला तरी खूश करण्यासाठी अज्ञानातून चुकीची आणि बालिश मागणी केली जात आहे, अशी टीका माजी खासदार शेट्टी यांनी केली.